शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

गोदामाच्या आगीचे गूढ कायम

By admin | Updated: December 4, 2014 00:52 IST

जालना : येथील पंचायत समितीच्या गोदामास गेल्या वर्षापूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या चौकशीसंदर्भात शासकीय पातळीवर अद्यापही कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत.

जालना : येथील पंचायत समितीच्या गोदामास गेल्या वर्षापूर्वी लागलेल्या भीषण आगीच्या चौकशीसंदर्भात शासकीय पातळीवर अद्यापही कागदोपत्री घोडे नाचविले जात आहेत. जुना जालना भागात पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात मोठे गोदाम आहे. त्या गोदामात कृषी व समाज कल्याण विभागांतर्गत विविध योजनेतील लाभार्थ्यांसाठीचे साहित्य मोठ्या साठविण्यात आले होते. लाभार्थ्यांना ते साहित्य वितरित करण्याऐवजी अनेक महिन्यांपासून धूळखात पडून होते. विशेषत: रमाई घरकुल योजनेसाठी पहिल्याच वर्षी म्हणजेच २०११ -१२ या वर्षासाठी एस. सी अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी हजारो ब्लँकेट, सतरंजी व सौर दिव्यांचे साहित्य वाटपासाठी आले होते. ३० मार्च २०१३ रोजी सायंकाळी गोदामाला लागलेल्या आगीत ते संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. परिणामी हजारो लाभार्थी साहित्यापासून वंचित राहिले. या आगीत कृषी विभागातर्फे आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना, अल्पभूधारकांना वितरीत केल्या जाणारे कृषी औजारे व अन्य साहित्यही भस्म झाले. या आगीत किमान ५० ते ६० लाख रुपयांचे साहित्य खाक झाल्याचा सकृतदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात आला होता. ती आग संशयास्पद असल्याचाही सूर शासकीय वर्तूळातूनच व्यक्त करण्यात येत होता. त्या अनुषंगानेच चौकशी व्हावी, अशी मागणी काही लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. तेव्हा शासकीय स्तरावर त्या आगीसंदर्भात चौकशीसाठी हालचाली सुरु झाल्या. गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश बजावल्यानंतर त्या आगीमागील गुढ उघडकीस येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. परंतु सव्वा वर्ष उलटल्यानंतर सुध्दा त्या आगीमागील कारण, त्यात खाक झालेल्या वस्तू, त्याच्या किंमती, एकूण नुकसान तसेच गोदामकीपरची हजेरी, गैरहजरी, निष्काळजीपणा वगैरे गोष्टींबाबत स्पष्टता झाली नाही. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या अनुषंगाने पंचनामा केला. पोलिस प्रशासनाने नोंद घेवून सकृतदर्शनी पंचनामा केला. परंतु त्यापुढे घोडे सरकले नाही. वास्तविकता आग कोणत्या कारणामुळे लागली याची चौकशी करण्यासाठी समाजकल्याण आयुक्तांनी दोन वेळेस पंचायत समितीला पत्र पाठवले. याची शहानिशा करण्याच्या सुचना दिल्या. पंचायत समितीने पत्र प्राप्त झाल्यानंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी समाज कल्याण खात्यास पुन्हा पत्र पाठविण्याची वेळ आली आहे. या प्रकरणाची चौकशी पुढे सरकत नसल्याने या आगीचे गुढ कायम आहे. शंका-कुशंका निर्माण होत आहेत. यापूर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत जाणीवपूर्वक दाखविलेल्या उदासनीतेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. नव्या गटविकास अधिकाऱ्यांनी याची कसून चौकशी करावी, असा सूर आहे.(प्रतिनिधी)रमाई घरकुल योजनेअंतर्गत जिल्हातील एस.सी प्रवार्गातील नागरीकांना ब्लॅकेट, सतरंजी, सौरदिवे वितरण करण्यात आले होते. त्यात जालना तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यासाठी आलेले साहित्य या गोदाताम धुळखात होते. या व्यतिरिक्त कृषी विभागाच्याही फवारणी पंप, पाईप ताडपत्र्या असे लाखो रूपयांच्या साहित्याचा समावेश होता.पंचायत समितीच्या गोदामाला लागलेल्या आगीत सर्व साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अहवालानुसार ही आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु त्या गोदामात विजेचे कनेक्शन किंवा तारा वगैरे गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळेच ही आग कशामुळे लागली याचा आत्तापर्येत थांगपत्ता नाही. यामुळे याविषयी तर्क-वितर्क व्यक्त होत आहेत.या साहित्य जळीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समाजकल्याण आयुक्त यांनी दोन वेळेस पत्र पाठविले परंतु त्यांच्या पत्राला पंचायत समितीकडून कोणताच खुलासा देण्यात आला नाही. त्यामुळे आयुक्त कार्यालयाकडून पुन्हा पत्र पाठविण्यात आले आहे. त्यासाठी निर्लेखन अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचे बीडीओ सचिन सूर्येवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.