शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या मुद्यावर उच्च न्यायालयात जाणार

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : जायकवाडीच्या पाण्याबाबत निर्णय उच्च न्यायालयाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बाजू लक्षात घेतली नाही. महामंडळाला पार्टी न करताच निर्णय दिला

औरंगाबाद : जायकवाडीच्या पाण्याबाबत निर्णय उच्च न्यायालयाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बाजू लक्षात घेतली नाही. महामंडळाला पार्टी न करताच निर्णय दिला. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महामंडळ लवकरच याप्रकरणी पुन्हा न्यायालयात जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले.पाणीवाटपाच्या समन्यायी तत्त्वानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीत तातडीने पाणी सोडावे, असे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी दिले होते. प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या आदेशांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. तेव्हा उच्च न्यायालयाने फक्त पिण्याची गरज भागविण्यासाठी गरज पडली तरच पाणी सोडावे, असे आदेश दिले आहेत. याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मी माहिती घेतली आहे. न्यायालयाने हा निर्णय देताना गोदावरी महामंडळाला पार्टीच केलेले नाही. त्यामुळे हा निर्णय न पटणारा आहे. शिवाय, शासनाने समन्यायी पाणी वाटपाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. त्यानुसार जायकवाडीला पाणी मिळालेच पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. म्हणून आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकर गोदावरी महामंडळ या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्राधिकरणाने पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर दीड महिना त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याकडे दुर्लक्ष झाले. या दिरंगाईबद्दल मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणताही खुलासा केला नाही.