शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

जायकवाडीच्या मुद्यावर उच्च न्यायालयात जाणार

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : जायकवाडीच्या पाण्याबाबत निर्णय उच्च न्यायालयाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बाजू लक्षात घेतली नाही. महामंडळाला पार्टी न करताच निर्णय दिला

औरंगाबाद : जायकवाडीच्या पाण्याबाबत निर्णय उच्च न्यायालयाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची बाजू लक्षात घेतली नाही. महामंडळाला पार्टी न करताच निर्णय दिला. त्यामुळे या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महामंडळ लवकरच याप्रकरणी पुन्हा न्यायालयात जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले.पाणीवाटपाच्या समन्यायी तत्त्वानुसार नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीत तातडीने पाणी सोडावे, असे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी दिले होते. प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या आदेशांना स्थगिती देण्यात यावी या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. तेव्हा उच्च न्यायालयाने फक्त पिण्याची गरज भागविण्यासाठी गरज पडली तरच पाणी सोडावे, असे आदेश दिले आहेत. याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मी माहिती घेतली आहे. न्यायालयाने हा निर्णय देताना गोदावरी महामंडळाला पार्टीच केलेले नाही. त्यामुळे हा निर्णय न पटणारा आहे. शिवाय, शासनाने समन्यायी पाणी वाटपाचे तत्त्व स्वीकारलेले आहे. त्यानुसार जायकवाडीला पाणी मिळालेच पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. म्हणून आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकर गोदावरी महामंडळ या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. प्राधिकरणाने पाणी सोडण्याचे आदेश दिल्यानंतर दीड महिना त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्याकडे दुर्लक्ष झाले. या दिरंगाईबद्दल मात्र मुख्यमंत्र्यांनी कोणताही खुलासा केला नाही.