शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

वर्ष उलटूनही अनुदान मिळेना

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता अनुदानही जाहिर केले होते. मात्र प्रत्यक्षात अनुदान पदरी पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पराकष्ठा केल्या. तरीही जिल्ह्यातील तब्बल २ लाख २८ हजार ४८८ शेतकरी हे अनुदान पासून वंचितच राहिले आहेत.खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. लागवडीपासून पाण्याची कमतरता तर काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा मारा या दुहेरी फटक्यामुळे खरीप हातचा गेला होता. प्रशासनाकडून शेतकऱ्यांविषयी सहानभुती दाखवत अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार ५० टक्के पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४५०० रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार होती. अनुदान जाहिर झाल्यापासून शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनुदानाच्या रकमेसाठी प्रथम शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये खाते उघडण्याचे अनिवार्य करण्यात आले.त्याकरिता शेतकऱ्यांना बॅकेच्या दारी खेटे मारावे लागत आहेत. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच देण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीदरम्यान मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने काम चालु असून आठ दिवसांच्या आत अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एकीकडे उर्वरित शेतकऱ्यांच्या खरीप अनुदानासाठी प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या मध्यावधीत बळीराजाला बियाणांसाठी पैशाची गरज आहे. गरजेपोटी शेतकरी बॅकांकडे हेलपाटे मारत आहे. आता खरिपाचे अनुदान मिळाले नाही तर खाजगी सावकाराचा सहारा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. म्हणजेच पहिले पाढे पंच्चावंन्न अशा कात्रीत जिल्ह्यातला शेतकरी सापडला आहे.