शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

वर्ष उलटूनही अनुदान मिळेना

By admin | Updated: May 13, 2015 00:28 IST

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता

बीड: गतवर्षीही अवकाळीच्या फटक्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होत. प्रशासकिय स्तरावर नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांकरिता अनुदानही जाहिर केले होते. मात्र प्रत्यक्षात अनुदान पदरी पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पराकष्ठा केल्या. तरीही जिल्ह्यातील तब्बल २ लाख २८ हजार ४८८ शेतकरी हे अनुदान पासून वंचितच राहिले आहेत.खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. लागवडीपासून पाण्याची कमतरता तर काढणीच्या वेळी अवकाळी पावसाचा मारा या दुहेरी फटक्यामुळे खरीप हातचा गेला होता. प्रशासनाकडून शेतकऱ्यांविषयी सहानभुती दाखवत अनुदान देण्याचे घोषित केले. त्यानुसार ५० टक्के पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४५०० रुपयांप्रमाणे रक्कम मिळणार होती. अनुदान जाहिर झाल्यापासून शेतकऱ्यांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. अनुदानाच्या रकमेसाठी प्रथम शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बॅकांमध्ये खाते उघडण्याचे अनिवार्य करण्यात आले.त्याकरिता शेतकऱ्यांना बॅकेच्या दारी खेटे मारावे लागत आहेत. बुडत्याला काडीचा आधार याप्रमाणे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांना केवळ आश्वासनेच देण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा बैठकीदरम्यान मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने काम चालु असून आठ दिवसांच्या आत अनुदानाचे वाटप करण्यात येणार असल्याचे प्रशासकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)एकीकडे उर्वरित शेतकऱ्यांच्या खरीप अनुदानासाठी प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे तर दुसरीकडे मे महिन्याच्या मध्यावधीत बळीराजाला बियाणांसाठी पैशाची गरज आहे. गरजेपोटी शेतकरी बॅकांकडे हेलपाटे मारत आहे. आता खरिपाचे अनुदान मिळाले नाही तर खाजगी सावकाराचा सहारा शेतकऱ्यांना घ्यावा लागेल. म्हणजेच पहिले पाढे पंच्चावंन्न अशा कात्रीत जिल्ह्यातला शेतकरी सापडला आहे.