शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

२५ टक्के जागांवरील मोफत प्रवेशाची चौकशी

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व एससी, एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात शाळांकडून मनमानी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

औरंगाबाद : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व एससी, एसटी प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २५ टक्के जागांवर प्रवेश देण्यात शाळांकडून मनमानी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी तीनसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बुधवारी झालेल्या मासिक बैठकीत घेण्यात आला. शिक्षण सभापती बबन कुंडारे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मासिक बैठक घेण्यात आली. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गातील विद्यार्थ्यांना राखीव असलेल्या २५ टक्के जागांवर खासगी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून प्रवेश दिला जात नसल्याच्या तक्रारी प्रारंभी सदस्यांनी केल्या. तसेच जिल्हा परिषदेकडेही यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या शाळांच्या प्रवेश प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. विशेषत: एसबीओए, टेंडर केअर होम, बीड बायपास, नाथ व्हॅली, पैठण रोड, पोद्दार इंटरनॅशनल, रिव्हरडेल हायस्कूल, संत मीरा इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, महेशनगर व दौलताबाद टी पॉइंट, ज्ञानदा इंग्लिश स्कूल, सरस्वती भुवन व शारदा मंदिर या शाळांविरुद्ध सर्वाधिक तक्रारी आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली. या शाळांची चौकशी करण्यासाठी सभापती कुंडारे यांच्या अध्यक्षतेखाली तीनसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आजच्या बैठकीत इतर दोन सदस्यांची निवड करण्यात आली नाही. जिल्ह्यातील काही विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांना शासन नियमानुसार मासिक वेतन दिले जात नाही. त्यांना नाममात्र मानधनावर राबविले जाते. या बाबींचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. अनंत भालेराव माध्यमिक शाळेविरुद्ध उपरोक्त तक्रार आहे. वादळामुळे पत्रे उडून पडझड झालेल्या शाळांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी सूचना सदस्य प्रभाकर आबा काळे, पुष्पा जाधव यांनी केली. आरटीई कायद्यानुसार ज्या शाळांना ५ वी व ८वीचे वर्ग सुरू करण्याची आवश्यकता आहे, तेथे तात्काळ वर्ग सुरू करावेत. सायगाव (ता. कन्नड) येथील माध्यमिक शाळेची चौकशी करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. पदवीधर शिक्षकांची तात्काळ पदोन्नती करावी, अशी मागणी मधुकर वालतुरे व श्याम राजपूत यांनी केली. आचारसंहिता संपताच प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान सोनवणे, प्रदीप राठोड, संजय भालेराव आदींची यावेळी उपस्थिती होती. २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासंदर्भात ओरड होत असताना गेल्या वर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील १५१५ जागांसह शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारीत येणाऱ्या औरंगाबादसह जालना, बीड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील तब्बल २३७८ जागा रिक्त राहिल्या होत्या.शिक्षणाधिकारी देशमुख यांनी सांगितले की, काही शाळांमधून प्रवेश घेण्यावर पालकांच्या उड्या पडतात. इतर शाळांमधून या राखीव जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे पालकांनी काही विशिष्ट शाळांचाच आग्रह धरू नये. २०१३-१४ साठी २५ मोफत प्रवेशाच्या जागांची माहिती जिल्हापात्र शाळा२५ टक्के जागा विद्यार्थीप्रवेश रिक्त जागाऔरंगाबाद२५०२४३५ ९२० १५१५जालना९८१०३७ ८०३२३४बीड १०५१०४१ ७११३३०परभणी८३१२०८ ९७३२३५ हिंगोली३३१९१ १२७६४एकूण५६९५९१२ ३५३४२३७८