शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

घाटी रुग्णालयाच्या शवागारात दुर्गंधी

By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) शवागारात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत आहे. या शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत असल्याचा हा परिणाम आहे.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) शवागारात गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत आहे. या शवागाराची वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत असल्याचा हा परिणाम आहे. हे शवागार अत्यंत जुन्या पद्धतीचे आहे. त्यात शवपेट्या नसल्यामुळे तेथील स्ट्रेचरवर किंवा जमिनीवर मृतदेह ठेवलेले असतात. साधारणत: ८ ते १० मृतदेह शवागारात असतात. घाटीत रोज सरासरी १० ते १५ शवविच्छेदन होतात. यातील काही मृतदेह पोलिसांना रस्त्याच्या कडेला, धर्मशाळा, रेल्वेस्टेशन, बसस्थानक, घाटी परिसरात बेवारस अवस्थेत आढळलेले असतात. रेल्वेसमोर आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे. मृत्यूच्या सहा तासांनंतर मानवी देह कुजायला सुरुवात होते. बर्‍याचदा पोलिसांना कुजलेला व बेवारस मृतदेह सापडतो. मृतदेह कुजलेला असला तरी किमान चार दिवस तो शवागारात ओळख पटविण्यासाठी ठेवला जातो. चांगल्या अवस्थेतील मृतदेह आठ ते दहा दिवस शवागारात राहतो. तो अधिक कुजतो. शवविच्छेदन केलेल्या शरीरातून दुर्गंधी यायला सुरुवात होते. शवागारात सर्व मृतदेह उघडे ठेवलेले असल्यामुळे एका सडलेल्या मृतदेहामुळे अन्य मृतदेहही लवकर कुजण्यास सुरुवात होते. परिणामी शवागारात दुर्गंधी पसरलेली असते. या शवागाराचे दार उघडताच दुर्गंधीचा भपकारा येतो. मृतदेह ठेवण्यासाठी स्वतंत्र शीतपेट्या तेथे नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. शवागाराचे तापमान २ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास शवागाराचे तापमान घसरते आणि मृतदेह अधिक वेगाने कुजू लागतात. काही जण नातेवाईकाचा मृतदेह एक किंवा दोन दिवस शवागारात ठेवतात, तेव्हा त्यांना शवागाराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे शीतयंत्रणा बंद पडल्यास मृतदेह कुजू शकतो, हे मुद्दाम सांगितले जाते.