शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

रेशनच्या काळ्या बाजाराला आळा

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे रेशनवरील काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या बायोमेट्रिक पद्धतीमुळे रेशनवरील काळ्या बाजाराला काही प्रमाणात आळा बसला आहे. बायोमेट्रिक मशीन बसलेल्या दुकानांवर कधी नव्हे ते लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहत आहे. आॅगस्ट महिन्याअखेरीस तब्बल ८४ टक्के केशरी कार्डधारकांचे धान्य या दुकानांवर शिल्लक राहिले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य गटातील बहुतांश लाभार्थ्यांचे धान्यही शिल्लक दिसून आले आहे. अनेक लाभार्थी रेशन दुकानावरून अन्नधान्य नेत नाहीत. तरीही दुकानदारांकडून सर्वच लाभार्थ्यांनी धान्याची उचल केल्याचे दाखवून त्याची काळ्या बाजारात विक्री केली जाते. या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत लागू केली. या अंतर्गत लाभार्थ्याच्या बोटाचे ठसे घेऊनच त्यांना धान्याचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७७७ पैकी २७ दुकानांवर ही पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित दुकानदारांना टॅब्लेट देण्यात आले आहेत. बोटाचे ठसे जुळल्यानंतर लगेचच टॅब्लेटद्वारे त्याची आॅनलाईन नोंद होते. त्यामुळे कोणत्या आणि किती लाभार्थ्यांनी धान्य नेले, कोणत्या लाभार्थ्यांनी धान्य उचलले नाही, हे लक्षात येते. त्यामुळेच आता कधी नव्हे ते रेशन दुकानांवर धान्य शिल्लक राहिल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद शहरातील ९, फुलंब्री तालुक्यातील ९ आणि गंगापूर तालुक्यातील ९ दुकानांवर सध्या बायोमेट्रिक यंत्रणा कार्यरत आहे. या दुकानांवर आॅगस्ट महिन्यात बहुतांश लाभार्थ्यांचे धान्य शिल्लक राहिले असल्याचे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी मंगळवारी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या २७ दुकानांवर एपीएलचे (केशरी) १८ हजार कार्डधारक आहेत. यातील अडीच हजार कार्डधारकांनीच धान्य नेले. अंत्योदय योजनेच्या २२ टक्के लाभार्थ्यांनीही रेशनकडे पाठ फिरविली. अन्नसुरक्षा योजनेतील प्राधान्यक्रम गटातील २४ टक्के लाभार्थ्यांनीही धान्य घेतलेले नाही. या दुकानांवरील प्राधान्यक्रम गटातील लाभार्थ्यांची संख्या ७७०० इतकी आहे. यापैकी १८०० जणांनी धान्य उचलले नाही.