शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पाच वर्षातील एक कोटींचा खर्च मिळेना

By admin | Updated: April 3, 2015 00:38 IST

संजय कुलकर्णी, जालना जिल्ह्यात २०१० ते मार्च २०१५ या कालावधीत आतापर्यंत झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा १ कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अद्यापही

संजय कुलकर्णी, जालनाजिल्ह्यात २०१० ते मार्च २०१५ या कालावधीत आतापर्यंत झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा १ कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अद्यापही शासनाकडून जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेला नाही. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भत्ते तसेच देयके रखडलेली आहेत.शासनाकडून निवडणुकांचा खर्च वेळेत न मिळाल्याने ३० मार्च रोजी राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यावर बहिष्कार टाकला. परंतु निवडणूक आयोगाने निलंबनाचा इशारा देताच मध्यरात्रीतून ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीचा खर्च वेळेत मिळावा, अशी प्रशासकीय यंत्रणेप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नागरिकांनीही व्यक्त केली आहे. जालना तालुक्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा ५ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च अद्याप मिळालेला नाही. बदनापूर तालुक्यात १२ लाख ५५ हजार ३३२, भोकरदन तालुक्यात १२ लाख २५ हजार, जाफराबाद तालुक्यात २४ लाख ८९ हजार ८८२, परतूर तालुक्यात २० लाख ९६ हजार ६६, अंबड तालुक्यात १५ लाख ४५ हजार तर घनसावंगी तालुक्यासाठीचा ९ लाख ४० हजार रुपयांचा खर्च मिळणे बाकी आहे.याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा प्रलंबित निधी मिळावा, यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी पाठपुरावाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.