शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

पाच वर्षातील एक कोटींचा खर्च मिळेना

By admin | Updated: April 3, 2015 00:38 IST

संजय कुलकर्णी, जालना जिल्ह्यात २०१० ते मार्च २०१५ या कालावधीत आतापर्यंत झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा १ कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अद्यापही

संजय कुलकर्णी, जालनाजिल्ह्यात २०१० ते मार्च २०१५ या कालावधीत आतापर्यंत झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा १ कोटी १ लाख २६ हजार रुपयांचा खर्च अद्यापही शासनाकडून जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेला नाही. परिणामी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भत्ते तसेच देयके रखडलेली आहेत.शासनाकडून निवडणुकांचा खर्च वेळेत न मिळाल्याने ३० मार्च रोजी राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यावर बहिष्कार टाकला. परंतु निवडणूक आयोगाने निलंबनाचा इशारा देताच मध्यरात्रीतून ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीचा खर्च वेळेत मिळावा, अशी प्रशासकीय यंत्रणेप्रमाणेच प्रत्येक तालुक्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या नागरिकांनीही व्यक्त केली आहे. जालना तालुक्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या जि.प., पं.स. व ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचा ५ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च अद्याप मिळालेला नाही. बदनापूर तालुक्यात १२ लाख ५५ हजार ३३२, भोकरदन तालुक्यात १२ लाख २५ हजार, जाफराबाद तालुक्यात २४ लाख ८९ हजार ८८२, परतूर तालुक्यात २० लाख ९६ हजार ६६, अंबड तालुक्यात १५ लाख ४५ हजार तर घनसावंगी तालुक्यासाठीचा ९ लाख ४० हजार रुपयांचा खर्च मिळणे बाकी आहे.याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा प्रलंबित निधी मिळावा, यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी पाठपुरावाही करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नायक यांनी सांगितले.