नळदुर्ग : एका वाड्यातील दोन घरांसह गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने तब्बल पाच लाख, २० हजार रुपयांचे नुकसान झाले़ ही घटना शनिवारी सकाळी ९़३० वाजण्याच्या सुमारास अणदूर (ता़तुळजापूर) येथे घडली़ अणदूर येथील राजेश विजयकुमार देवसिंगकर, विजयकुमार रंगनाथ देवसिंगकर हे दोघे ब्राम्हणगल्ली परिसरातील एका वाड्यात राहतात़ शनिवारी सकाळी ते दोघे कुटुंबासह लग्नकार्यासाठी बाहेरगावी गेले होते़ त्याच दरम्यान, या वाड्यातील दोन्ही घरांसह गोठ्यास आग लागली़ आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्याने घरावरील पत्रे, संसारोपयोगी साहित्य, कपडे, धान्य, दीड हजार फूट पीव्हीसी पाईप, विहिरीतील विद्युत मोटार, शिलाई मशीन आदी साहित्य जळून खाक झाले़ शेजारी असलेला गोठा व आतील साहित्यही या आगीत जळून खाक झाले़ दरम्यान, घरातून धूर येत असल्याने घराला आग लागल्याची बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली़ सोमनाथ शेटे, अप्पासाहेब आलुरे, दीपक घुगे, दयानंद मुडके आदी नागरिकांनी जवळपास एक तास शर्थीचे प्रयत्न करूनही ही आग अटोक्यात आली नाही़ यात राजेश देवसिंगकर यांचे एक लाख तर विजयकुमार देवसिंगकर यांचे सव्वा चार लाख रूपयांचे नुकसान झाले़ तलाठी डी़एनग़ायकवाड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला़ भाजपाचे मिलिंद पाटील, दत्ता राजमाने, आनंद काळे, साहेबराव घुगे आदींनी भेट देवून पाहणी केली़ दरम्यान, देवसिंगकर कुटुंबियांना प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे़
अणदूर येथे दोन घरांना आग
By admin | Updated: May 25, 2014 01:06 IST