शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

पॅसेंजर गाड्यांमध्ये अग्निरोधक साहित्याची वानवा

By admin | Updated: October 27, 2014 00:11 IST

संतोष हिरेमठ, औरंगाबाद रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे

संतोष हिरेमठ, औरंगाबाद‘रेल्वे प्रवासादरम्यान ज्वालाग्राही पदार्थ नेऊ नये,’ अशी केवळ घोषणा करून रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे. एक्स्प्रेस रेल्वेच्या द्वितीय आणि अनारक्षित बोगींमध्ये, त्यातही पॅसेंजर गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आग वेळीच रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची वानवा दिसून येत आहे. आवश्यक ती यंत्रणा पुरविण्याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याने ‘बर्निंग ट्रेन’चा धोका मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वसामान्य प्रवाशांपासून तर उच्च श्रेणीच्या प्रवाशांकडून रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वर्षभर प्रवाशांची रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी दिसून येते; परंतु सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र विविध रेल्वेगाड्यांमधील परिस्थितीवरून दिसून येत आहे. उच्च श्रेणीच्या वातानुकूलित बोगींमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्ष असल्याचे चित्र आहे. बहुतांश एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वातानुकूलित बोगींमध्ये अग्निरोधक साहित्य दिसून येते; परंतु द्वितीय श्रेणीत ही यंत्रणा अपवादानेच दिसून येते. त्यातही पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये या यंत्रणेची वानवाच दिसून येते. रेल्वे इंजिन, गार्डची बोगी, पेंट्री कार या ठिकाणीच ही अग्निशमन यंत्रणा ठेवण्याची तसदी प्रशासन घेत आहे. रेल्वेमध्ये दुर्दैवाने आग लागल्यास अग्निशमनविरोधी सिलिंडरमधील कार्बन डायआॅक्साईड गॅसद्वारे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण येण्यास मोठी मदत होते; परंतु प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेगाड्यांचा प्रवास जीवावर बेतत आहे.