शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पॅसेंजर गाड्यांमध्ये अग्निरोधक साहित्याची वानवा

By admin | Updated: October 27, 2014 00:11 IST

संतोष हिरेमठ, औरंगाबाद रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे

संतोष हिरेमठ, औरंगाबाद‘रेल्वे प्रवासादरम्यान ज्वालाग्राही पदार्थ नेऊ नये,’ अशी केवळ घोषणा करून रेल्वे प्रशासन आगीच्या घटना रोखण्याची जबाबदारी झटकत असल्याची परिस्थिती अनेक रेल्वेगाड्यांमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून येत आहे. एक्स्प्रेस रेल्वेच्या द्वितीय आणि अनारक्षित बोगींमध्ये, त्यातही पॅसेंजर गाड्यांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आग वेळीच रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची वानवा दिसून येत आहे. आवश्यक ती यंत्रणा पुरविण्याकडे रेल्वे प्रशासन कानाडोळा करीत असल्याने ‘बर्निंग ट्रेन’चा धोका मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.सर्वसामान्य प्रवाशांपासून तर उच्च श्रेणीच्या प्रवाशांकडून रेल्वेतून प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वर्षभर प्रवाशांची रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी दिसून येते; परंतु सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र विविध रेल्वेगाड्यांमधील परिस्थितीवरून दिसून येत आहे. उच्च श्रेणीच्या वातानुकूलित बोगींमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्ष असल्याचे चित्र आहे. बहुतांश एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांच्या वातानुकूलित बोगींमध्ये अग्निरोधक साहित्य दिसून येते; परंतु द्वितीय श्रेणीत ही यंत्रणा अपवादानेच दिसून येते. त्यातही पॅसेंजर रेल्वेगाड्यांमध्ये या यंत्रणेची वानवाच दिसून येते. रेल्वे इंजिन, गार्डची बोगी, पेंट्री कार या ठिकाणीच ही अग्निशमन यंत्रणा ठेवण्याची तसदी प्रशासन घेत आहे. रेल्वेमध्ये दुर्दैवाने आग लागल्यास अग्निशमनविरोधी सिलिंडरमधील कार्बन डायआॅक्साईड गॅसद्वारे परिस्थितीवर वेळीच नियंत्रण येण्यास मोठी मदत होते; परंतु प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेगाड्यांचा प्रवास जीवावर बेतत आहे.