शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

अखेर महावितरणने ५ एमव्हीएचे रोहित्र बसविले

By admin | Updated: November 20, 2014 00:46 IST

तीर्थपुरी : येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र जळाल्याने ११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे डाव्या कालव्याला पाणी असून

तीर्थपुरी : येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र जळाल्याने ११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे डाव्या कालव्याला पाणी असून घेता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले होते. याबाबत ‘लोकमत’ च्या १७ नोव्हेंबर रोजी हॅलो जालनाच्या अंकातील वृत्ताची दखल घेत १९ रोजी रोहित्र बसविण्याचे काम सुरू झाले. गुरुवारी शेतीसाठी वीजपुरवठा सुरू केला जाईल, असे वीज वितरणचे उपअभियंता गुंजारगे यांनी सांगितले.तीर्थपुरी येथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी रात्री जळाल्याने तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, शेवता, खा. हिवरा, जोगलादेवी, रामसगाव, रूई या गावाचा शेतीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद केला होता. केवळ तीर्थपुरी, भायगव्हाण जिनिंग हाच गावठाणचा वीजपुरवठा दुसऱ्या ५ एमव्हीएवरून सुरू होता.दरम्यान, या गावाला जायकवाडीच्या डाव्या कालव्यावरून अनेकांनी कर्ज काढून पाईपलाईन केलेली असताना व डाव्या कालव्याला पाणी पाळी चालू असताना केवळ वीज पुरवठा बंद असल्याने पिकांना ते देता येत नव्हते. यामुळे शेतकरी हैराण झाले होते. लोकमतने या प्रश्नावर वाचा फोडली आणि लगेच तातडीने ५ एमव्हीएचा रोहित्र बसवला. १९ रोजी तो पूर्ण बसवून चार्ज करण्याचे काम एक दिवस चालणार असून, २० रोजी रात्री वरील ११ गावातील शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)