शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

घरापेक्षा शेतकऱ्यांना ऊस गाळपाची भीती

By admin | Updated: November 28, 2014 01:13 IST

विठ्ठल भिसे ,पाथरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की,

विठ्ठल भिसे ,पाथरीऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी ऊस उत्पादित केल्यानंतर आपला ऊस कारखान्याने गाळप करावा, अशी चिंता लागून राहते. उसाचे क्षेत्र कमी असो की, जास्त मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप होईपर्यंत चिंता लागू राहिेलेली असते. यामुळे उसाला भाव कितीही द्या मात्र ऊस गाळपास वेळेवर न्या, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. पाथरी तालुका हा जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात आणि गोदावरी नदीच्या पट्यामध्ये येतो. गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उच्च पातळीचे बंधारे उभारण्यात आले आहेत. जायकवाडीचे पाणी व गोदावरी पात्रातील बंधाऱ्याचे पाणी यामुळे या भागात मागील २० वर्षापासून शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड करतो. पाथरी येथे सहकार तत्वावर सुरू करण्यात आलेल्या गोदावरी दुधना कारखान्यावर या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक क्रांती घडून आली होती. कालांतराने कारखान्याचे दृष्टचक्र फिरून कारखाना आवसायानात निघाला त्यानंतर शासनाने हा कारखाना विक्री केला. सध्या कारखान्याची विक्री प्रक्रिया न्यायप्रविष्ठ असल्याने रेणुका शुगरच्या माध्यमातून हा कारखाना खाजगी तत्वावर २००८ पासून सुरू आहे. त्याचबरोबर लिंबा येथील योगेश्वरी शुगर हा खाजगी कारखानाही आहे. या तालुक्यात दोन खाजगी कारखाने असतानाही या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव कधी मिळालाच नाही. कारखान्याची गाळप यंत्रणा व्यवस्थितरित्या राबविली न जात असल्याने शेतकऱ्यांना ऊस गाळपास जाईपर्यंत त्रास सहन करावा लागतो. या दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रामध्ये साधारणत: ४ लाख मे.टन ऊस उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या दिवसात योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. पर्यायाने उसाची वाढ मोठ्या प्रमाणावर खुंटली गेली आहे. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनाच यावर्षी चांगला उतारा येत आहे. सरासरी उतारा ग्रहीत धरला तर एकरी २५ टनही उसाला उतारा येत नाही. ऊस लागवडीपासून कारखान्याला गळीत हंगामाला जाईपर्यंत शेतकरी कष्ट करतो. परंतु, दरवर्षी कारखाना सुरू झाला की, शेतातील ऊस गाळप करण्यासाठी शेतकरी, ऊस तोडणी मुकदम शेतकी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे लागेबांधे करून ऊस तोडणी यंत्रणा शेतामध्ये घेऊन जातो. कोणता कारखाना आपल्या उसास जास्त भाव देणार आहे याची चिंता कधी शेतकरी करीत नाही. यामुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पीक घेतो खरे परंतु, त्याच्या पदरात मात्र काही पडत नाही. उसाच्या अशा परिस्थितीमुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून कापूस आणि सोयाबिनचे पीक घेतले. परंतु, शेतकऱ्यांच्या कापूस आणि सायोबीन या पिकालाही उतारा मात्र आला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक नाडी मात्र बिघडून गेली आहे.