शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

समान दलितवस्ती निधीसाठी उपोषण

By admin | Updated: May 3, 2016 01:06 IST

नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून होत असलेल्या दलितवस्ती विकास निधी वाटपात अनियमितता होत असल्याची तक्रार

नांदेड : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून होत असलेल्या दलितवस्ती विकास निधी वाटपात अनियमितता होत असल्याची तक्रार समाजकल्याण समितीचे सदस्य रमेश सरोदे यांनी करत सोमवारी जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले आहे़ निधी वाटपाची संपूर्ण प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली़जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे यासाठी दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ साठी जिल्हा परिषदेला ३२ कोटी रूपये निधी प्राप्त झाला आह़े मात्र या निधीचे नियोजन हे नियमाला धरून होत नसल्याची तक्रार सरोदे यांनी केली़ या निधीचे वाटप हे पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या मर्जीप्रमाणे करताना कोट्यवधीचा निधी स्वत: घेत सदस्यांची मात्र काही लाखांवर बोळवण केल्याचेही तक्रारीत त्यांनी नमूद केले़ एका समाजमंदिरासाठी लागणाऱ्या ५ लाखांचा निधी हा केवळ दीड लाखांवर आणला आहे़ त्यामुळे ही कामे पूर्ण होणार कशी असा प्रश्नही त्यांनी विचारला़ याबाबत अनेकदा पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाही विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सरोदे यांनी जिल्हा परिषदेपुढे उपोषण सुरू केले़ या उपोषणास जिल्हा परिषदेच्या अनेक सदस्यांनी पाठींबा दिला आहे़ दरम्यान, या उपोषणास सोमवारी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी भेट देवून चर्चा केली़ मात्र सरोदे हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले़ विशेष म्हणजे समाजकल्याण समितीच्या बैठकीपूर्वी दलितवस्ती सुधार योजनेच्या कामाचे आॅर्डर काढावेत आणि मगच सभा घ्यावी अशी भूमिका घेतल्याने आॅर्डर निघाल्या़ पण त्यात अनेक सदस्यांच्या निधींची पळवापळवी झाल्याचे उघड झाले़ त्यामुळेच उपोषण केल्याचे ते म्हणाले़दरम्यान, दलितवस्ती निधीतील अनियमिततेप्रकरणी जि़ प़ सदस्या डॉ़ मिनाक्षी कागडे यांनीही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे़ तसेच भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनीही या निधीचे फेरनियोजन करण्याची मागणी केली़