शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत

By admin | Updated: July 12, 2014 01:15 IST

उस्मानाबाद : महागाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये आणि किमान दरात नागरिकांना भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध व्हावेत

उस्मानाबाद : महागाईमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, अन्नधान्याची साठेबाजी होऊ नये आणि किमान दरात नागरिकांना भाजीपाला, फळफळावळ उपलब्ध व्हावेत आणि शेतकऱ्यांनाही त्यांचा शेतमाल थेट विक्री करता यावा, यासाठी आता प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात विक्री केंद्र सुरु करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे पंचायत समितीसमोर या थेट शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. अधिकाधिक शेतकऱ्यांनी याठिकाणी आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा आणि ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. नारनवरे यांनी केले.महागाईवर नियंत्रण ठेवण्याबाबत आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हा पुरवठा विभाग, कृषी विभाग आणि पणन विभाग यांच्या सहकार्याने आता जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात शेतकरी आणि शेतकरी गटांमार्फत थेट शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना योग्य भावात अन्नधान्य, फळभाज्या, फळे मिळू शकतील, असे यावेळी डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मदनलाल मिनीयार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्या प्रत्येक तालुक्यात दोन याप्रमाणे विक्री केंद्र सुरु करण्यात येणार आहे. उस्मानाबाद शहरात बार्शी नाका येथेही विक्री केंद्र सुरु होणार आहे. तुळजापूर येथे नळदुर्ग आणि तुळजापूर येथील पंचायत समिती परिसरात, उमरगा येथे कृषी चिकित्सालय आणि मुख्य रस्त्यालगत अशी दोन तर भूम येथे समर्थ नगर, परंडा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आणि मुख्य रस्ता, बार्शी रोड तर कळंब येथे नगरपालिका जवळ आणि द्वारकानगरी सोसायटी, शिवाजी चौक, कळंब येथे ही थेट शेतमाल विक्री केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)प्रत्येक शहरात होणार दोन केंद्रांची निर्मिती जिल्ह्यात भाजीपाला पिकाचे क्षेत्र १ हजार ७०६ एवढे आहे. सरासरी उत्पादकताही १७.०१ टन प्रति हेक्टरी अशी आहे तर एकूण उत्पादन हे २९ हजार ३० टन इतके आहे. या भाजीपाला पिकांमध्ये मुख्यत: पालेभाज्या, वांगे, टोमॅटो, गवार, मुळा, पडवळ, घेवडा, कारले, दोडका, भोपळा, बटाटा, काकडी आदी मुख्य भाजीपाला पिकांचा समावेश होतो. याशिवाय, मसाला पिकाखालील क्षेत ६ हजार १२८ हेक्टर इतके आहे. कांदा, लसूण, अद्रक, हळद ही पिके मसाला पिके म्हणून घेतली जातात. सरासरी उत्पादकता १६.५१ टन प्रति हेक्टरी अशी आहे. जिल्ह्यात एकूण ९ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. यापैकी केवळ उस्मानाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक होऊन लिलावाद्वारे त्याची विक्री केली जाते. तसेच जिल्ह्यातील ५४ आठवडी बाजारामध्येही शेतकरी त्यांच्या भाजीपाला पिकाची विक्री करतात. आताच्या या थेट शेतमाल विक्री केंद्राचा लाभ आता शेतकऱ्यांना घेता येणार असल्याने संबंधित शेतकरी आणि ग्राहक या दोघांच्याही दृष्टीने हा उपक्रम लाभदायक ठरणार आहे.