शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

तहसीलदारांना शेतकऱ्यांचा घेराव

By admin | Updated: June 27, 2014 01:04 IST

औरंगाबाद : गारपिटीमुळे नुकसान होऊनही अद्याप शासकीय आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील काही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना घेराव घातला.

औरंगाबाद : गारपिटीमुळे नुकसान होऊनही अद्याप शासकीय आर्थिक मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील काही गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदारांना घेराव घातला. तहसीलदारांनी सोमवारपर्यंत बँक खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी तहसीलदारांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. तासाभरानंतर पोलिसांनी या सर्व आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.मोसंबी उत्पादक शेतकरी संघाचे जयाजीराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक शेतकरी दुपारी १२ वाजता तहसीलमध्ये दाखल झाले. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे शासनाची आर्थिक मदत वाटप करण्यात आली. बहुसंख्य गावांना ही मदत मिळाली. मात्र, पिंप्रीराजा, गारखेडा, एकोड, पाचोड, आप्तगाव, लायगाव यासह तालुक्यातील ४२ गावांतील शेतकऱ्यांना नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही, असे का? असा जाब विचारून आंदोलक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला. हा घेराव सुमारे अर्धा तास कायम होता. अधूनमधून घोषणाबाजीही सुरू होती. गारपीटग्रस्तांना न्याय मिळालाच पाहिजे, दादा बाबांचा धिक्कार असो, शेतकरीविरोधी प्रशासनाचा धिक्कार असो, अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला.त्यानंतर तहसीलदारांनी शासनाकडून लवकरच काही निधी मिळणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी लगेच तहसीलदारांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. अर्धा तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर सिटीचौक पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. या आंदोलनात विलास चव्हाण, गणपत घोडके, हनुमान मदगे, संदीप घोडके, सोमनाथ घोडके, रावसाहेब शिंदे, यशवंत घोडगे, मनोहर झिंजुर्डे, सुनील राठोड, कृष्णा पवार, एकनाथ घोडके आदी सहभागी झाले. (लोकमत ब्युरो)सोमवारपर्यंत मदत खात्यावर जमा होईलशासनाकडून आणखी काही निधी लवकरच मिळणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत या गावातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जातील. तत्पूर्वी, शनिवारपर्यंत सर्व गावांमध्ये लाभार्थ्यांच्या याद्या डकविण्यात येतील, असे तहसीलदार विजय राऊत यांनी सांगितले.