शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘शेतकरी निवासस्थानां’ची दुरवस्था !

By admin | Updated: March 19, 2015 00:17 IST

पणन महामंडळाने राज्यातील बाजार समित्यांना आता महिला शेतकरी भवन निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी यापूर्वीच

पणन महामंडळाने राज्यातील बाजार समित्यांना आता महिला शेतकरी भवन निर्माण करण्याच्या सूचना केल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी यापूर्वीच लातूर, उदगीर, अहमदपूर बाजार समितीने तयार केलेल्या शेतकरी भवनाचे स्टींग केले असता, दुर्दशा निदर्शनास आली़ याठिकाणी निवास तर सोडाच क्षणभर थांबणेही धाडसाचेच ठरेल, इतके वाईट हाल शेतकरी भवनाचे झाले आहेत़ लातूरच्या शेतकरी निवासाची वास्तू बाहेरून देखणी दिसते. मात्र आतून अवकळाच आहे.लातूरनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ म्हणून उदगीरच्या बाजार समितीचा लौकिक आहे़ येथील आडते, व्यापारी, हमाल, मापाडी अन् कारभाऱ्यांनी निर्माण केलेल्या विश्वासामुळे केवळ उदगीर परिसरातूनच नव्हे तर सीमावर्ती भागातूनही मोठ्या प्रमाणात कृषीमालाची आवक असते़ आंध्रप्रदेशातील मुक्रमाबाद पासून ते कर्नाटकाच्या बीदरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी उदगीरची बाजारपेठ वरदान ठरली आहे़ याठिकाणी दूर अंतराहून शेतकरी शेतमाल घेऊन येतात़ हंगामामध्ये रांगा लागत असल्याने अनेकांच्या शेतमालाचे वजन होत नाही़ किंबहुणा रात्री उशिरापर्यंत त्यांना थांबावे लागते़ ही बाब लक्षात घेता बाजार समितीने शेतकऱ्यांच्या मुक्कामासाठी अल्प दरात निवासाची सोय शेतकरी भवनाच्या माध्यमातून केली़ परंतु, कालांतराने या भवनाच्या डागडुजीकडे व सुविधांकडे दुर्लक्ष होत गेल्याने शेतकऱ्यांना याठिकाणी मुक्काम करणे गैैरसोयीचे ठरु लागले़ परिणामी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेल्याने बाजार समितीने या भवनाकडे पूर्णपणे कानाडोळा केला़ आता तर या शेतकरी भवनाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे़ आत प्रवेश करताच लागणारा एक मोठा हॉल गळतीने हैराण आहे़ वर पत्र्याचे छत असल्याने जागोजागी गळती सुरु असते़ त्यामुळे भिंतीवरचा रंग उडून आत पाणी मुरत आहे़ शेजारीच असणाऱ्या निवासाच्या खोल्यांची पाहणी केली असता त्या धुळीने माखल्या होत्या़ एकही खाट दिसून आले नाही़ काही ठिकाणी पंखे गायब तर काही मोडकळीस आलेले होते़ बहुतांश ठिकाणे जाळ्यांनी वेढलेली होती़ इतकेच नव्हे तर झाडाच्या मुळाही भिंतीतून उगवलेल्या दिसून आल्या़ काही खोल्यांच्या मध्ये व व्हरांड्यात भंगार अस्ताव्यस्तपणे टाकलेले निदर्शनास आले़ येथील स्वच्छतागृहाची अवस्था तर अत्यंत वाईट बनली आहे़ दारे मोडून पडली आहेत़ आतील भाग धुळ व जाळ्यांनी माखला आहे़ अशा स्थितीत शेतकरी भवनात कोणता शेतकरी मुक्कामास जाईल, हे बाजार समितीच जाणो !लातूरच्या बाजारपेठेचा राज्यात गवगवा असला तरी शेतकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या शेतकरी निवासासाठी कुठलीही सुविधा नसल्याने आहे ते सभागृह दुरावस्थेच्या विळख्यात सापडले आहे़ त्यामुळे आडत बाजारात माल घेवून येणारा शेतकरी मुक्कामी राहणार तरी कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे़ नवीन जागेत सुसज्ज सुविधा असणारे शेतकरी निवास एमआयडीसी भागात उभारण्याचे स्वप्न शेतकऱ्याला दाखविले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत तरी शेतकरी निवास दुरावस्थेच्या विळख्यात आहे़लातुरात शेतकरी निवास तळमजल्यावर तर शौचालय व स्नानगृह वरच्या मजल्यावर करण्यात आलेले आहे़ कॅन्टींगची सोय तर नाहीच. परंतु, आहे त्या शेतकरी निवासात शेतकरी येतच नाहीत. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था आहे, असे विश्वासाने सांगणारे बाजार समितीचे सचिव हंगरगे यांना आतील अवस्थेचे वर्णन सांगताच त्यांनी आता शेतकरीच मुक्कामाला येत नसल्याचे सांगितले़ कोणीही मुक्कामाला येत नसल्यास विनाकारण खर्च कशाला वाढवायचा, असे काटकसरी मत त्यांनी मांडले़ तसेच गरजेनुसार शेतकऱ्यांच्या बैठका, हमाल-मापाड्यांच्या कार्यक्रमासाठी भवनाचा हॉल उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे सांगितले़ शासनाचे निर्देश पाळावेच लागतील असे सांगून, महिलासांठी शेतकरी भवन सध्याच्याच भवनाच्या वरच्या मजल्यावर करता येईल का, याची चाचपणी सुरु असल्याचेही हंगरगे म्हणाले़