शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला व फळविक्री केंद्र सुरू

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा

औरंगाबाद : आदिनाथनगर वसाहत (गारखेडा परिसर) या ठिकाणी तालुका कृषी कार्यालयामार्फत शेतकरी मंडळाकडून भाजीपाला व फळविक्री केंद्र उभारून शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट शहरी ग्राहकांपर्यंत जावा, असा संकल्प असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक पंडित लोणारे म्हणाले. केंद्राचे उद्घाटन भाजीपाला पुरवठा प्रकल्पाचे राज्य सल्लागार भगवान कापसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी भोसले, कृषी विकास अधिकारी कोलते, आत्माचे उपसंचालक शिरडकर, तहसीलदार विजय राऊत यांची उपस्थिती होती. या प्रकल्पांतर्गत शेतकरी मंडळाने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे वेगवेगळ्या वसाहतींमध्ये जाऊन विक्री करण्यापेक्षा एकाच ठिकाणी सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध ठेवला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी-ग्राहक असाच व्यवसाय वाढीस लागेल. त्यामुळे दलाल नाहीसे होऊन शेतकऱ्यांना योग्य भाव हाती अन् ग्राहकांना ताजा भाजीपाला मिळावा हाच कृषी विभागाचा उद्देश आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पिकविलेला भाजीपाला व फळे मिळणार आहेत. शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला थेट मिळणार असल्याने तो स्वस्त दरात व चांगल्या दर्जाचा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.४जय बाबाजी मंडळ, पळशी, हरसिद्धी माता शेतकरी मंडळ, ओहर यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील नागरिकांना ताजा भाजीपाला दररोज उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मॉल्सच्या बाजूलाच हा उपक्रम राबवून शेतकऱ्यांना वेगळे मार्केट निर्माण करून दिल्याने शेतकरीही उत्साहाने तयार झाले आहेत. ४नागरी वसाहतीमध्ये शेतकरी ते ग्राहक थेट फळे व भाजीपाला पुरवठा प्रकल्प सुरू करावयचा असेल त्यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे, ‘आत्मा’च्या जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे कृषी सहायक शिवानंद आडे यांनी सांगितले.