शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘त्या’ शेतकऱ्याचे कुटुंब सोडले वाऱ्यावर

By admin | Updated: March 31, 2015 00:35 IST

तळणी : उस्वद (ता. मंठा) येथील युवक शेतकरी राजेश दत्तराव सरोदे (वय ३४) या शेतकऱ्याने २६ मार्च रोजी रात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

तळणी : उस्वद (ता. मंठा) येथील युवक शेतकरी राजेश दत्तराव सरोदे (वय ३४) या शेतकऱ्याने २६ मार्च रोजी रात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सततच्या नापिकीला कंटाळून व बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याच्या नैराश्येतून सरोदे यांनी आपला जीवन प्रवास संपविला होता. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मात्र, शेतकरी आत्महत्येच्या चार दिवसानंतरही कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी या कुटुंबियांची साधी भेट घेऊन सांत्वनही केले नाही. उस्वद येथे माळरान शिवारात सरोदे यांना ६ एक र शेती होती. जमिन हलक ी असुन मागील दोन वर्षांपासून दुष्काळ अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतात उत्पन्न कमी अन् खर्च जास्त झाला होता. याशिवाय तळणी व मंठा येथील बँकांकडे वारंवार पीक कर्जासाठी विनंती के ली. मात्र, निराशा पदरी आली. त्यामुळे संसाराचा गाडा आणि शेतीचा खर्च भागविणे अवघड होऊ न बसले. यातूनच त्यांनी आत्महत्या केली. ही घटना दि. २७ मार्च रोजी सकाळी उघडक ीस आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सी. एम. चरभरे, बीट जमादार पाटील व तलाठी नितीन च्ािंचोले यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. मंठा येथे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद मंठा ठाण्यात घेण्यात आली. सरोदे हे कुटुंबातील एकमेव कर्ते व्यक्ती होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. मात्र, शेतक री आत्महत्येच्या घटनेनंतर चौथ्या दिवस उलटल्यानंतरही सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांपैकी कुणीही साधी भेट दिली नाही. (वार्ताहर)