शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

शेतकऱ्यांचे सावकाराकडील कर्ज फेडणार

By admin | Updated: December 18, 2014 00:35 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सावकारांनी दोन वर्षात २३ हजार ११९ शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख ६७ हजाराचे कर्ज वाटप केलेल आहे. मात्र हे कर्ज शेतीसाठी दिलेले नसल्याने

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सावकारांनी दोन वर्षात २३ हजार ११९ शेतकऱ्यांना १ कोटी ६३ लाख ६७ हजाराचे कर्ज वाटप केलेल आहे. मात्र हे कर्ज शेतीसाठी दिलेले नसल्याने याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? असा प्रश्न ‘लोकमत’ने बुधवारी उपस्थित केला होता. या वृताचे पडसाद विधानसभेत उमटले. अखेर शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कुठल्याही कारणासाठी कर्ज घेतले तरीही ते शासनाकडून भरले जाईल, असे स्पष्टीकरण शासनाने दिले आहे. जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या १०४ आहे. या सावकारांनी दोन वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. मात्र महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ अन्वये खाजगी सावकारांना परवाना देत असताना, शेतीसाठी कर्ज पुरवठा करता येणार नाही, अशी अट असल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कशी? असा प्रश्न उपस्थित झाला होता. बुधवारी ‘लोकमत’ने याच अनुषंगाने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी हा मुद्दा ‘पाँईट आॅफ इन्फर्मेशन’ च्या माध्यमातून विधानसभेत उपस्थित केला. शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड सरकार करेल, अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र बिगर शेती कारणासाठी घेतलेले कर्ज सरकार फेडेल का? याबाबत संभ्रमाची स्थिती असल्याचे आ. पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून कुठल्याही कारणासाठी कर्ज घेतले असेल तर ते मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार शासनाकडून भरले जाईल, असे स्पष्ट उत्तर संबंधित मंत्र्यांनी दिल्याने आता जिल्ह्यातील आठ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)४सन २०१४ मध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १९३५, तुळजापूर तालुक्यातील १७२३, उमरगा १३२९, लोहारा ६६७, भूम ६८५, परंडा, ८९८, कळंब ४६५ तर वाशी तालुक्यातील ३२९ शेतकऱ्यांनी विविध कारणासाठी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले आहे तर मागील दोन वर्षात जिल्ह्यातील २३ हजार १७९ शेतकऱ्यांना खाजगी सावकारांनी १ कोटी ६३ लाख ६७ हजार रुपयाचे कर्ज दिलेले आहे. शासनाच्या या स्पष्टीकरणामुळे या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. ४‘शेतकरी अन् सावकारालाही नाही फायदा’ या शिर्षकाखाली ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. शेतीसाठी एकाही शेतकऱ्याला कर्ज दिलेले नसल्याने शासनाच्या कर्ज माफीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार का? असा प्रश्न या वृत्तातून उपस्थित करण्यात आला होता. याची दखल घेत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत पॉर्इंट आॅफ इन्फर्मेशन’ चा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशन सुरू असताना एखाद्या महत्वाच्या घडलेल्या घटनेसंदर्भातील माहिती सभागृहाला अवगत करण्याची मुभा सदस्यांना असते, अशी माहिती देण्याकरिता वरील आयुधाचा वापर केला जातो.