शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

फ.मुं.शिंदे यांनीही लढवली होती निवडणूक

By admin | Updated: September 29, 2014 00:06 IST

बालासाहेब काळे, हिंगोली सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून मागील काही निवडणुकांचा आढावा घेतला असता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत आहे.

बालासाहेब काळे, हिंगोलीसध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून मागील काही निवडणुकांचा आढावा घेतला असता प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवार रिंगणात उतरल्याचे दिसत आहे. १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली, वसमत व कळमनुरी तब्बल ४३ उमेदवारांचा समावेश होता. यात अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रसिद्ध कवी फ.मुं.शिंदे यांनी जनता दलातर्फे भाग घेतला होता.कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ साली विठ्ठलराव चंपतराव नाईक (मस्के) यांनी कम्युनिस्ट पार्टी आॅ.ई.कडून निवडणूक लढवून ४५ हजार ५३१ मतांनी विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अ‍ॅड.शिवाजी माने यांना ३७ हजार १४४ मते मिळाली होती. फ.मुं.शिंदे यांना २ हजार ५३८ मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार गंगाराम जाधव यांना ८ हजार ९७७ तर रिपाइंचे जयाजी पाईकराव यांना १ हजार ८५६ मते मिळाली. या निवडणुकीत १५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. यात गणेशराव बळवंत यांना अपक्षांमधील सर्वाधिक १० हजार ८४५ मते मिळाली. वसमत मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार डॉ.जयप्रकाश मुंदडा यांनी ५३ हजार ५१४ मते घेऊन विजय मिळवला होता. भारिप- बहुजन महासंघाचे मारोती पिसाळ यांना २५ हजार २१० मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सखाराम बागल यांना ९ हजार ४२३ तर अपक्ष म्हणून लढलेले जयप्रकाश दांडेगावकर यांना १४ हजार २६० मते मिळाली होती. या निवडणुकीच्या रिंगणात १५ अपक्ष होते. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून १९९५ मध्ये भाजपाचे उमेदवार बळीराम पाटील कोटकर यांनी ३६ हजार २५७ मते घेऊन विजय संपादन केला होता. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार साहेबराव पाटील यांना ३३ हजार २०७ तर भारिप- बहुजन महासंघाचे उमेदवार माधवराव नाईक यांना २५ हजार २५१ मते मिळाली होती. जनता दलाचे केशव राठोड यांना ४ हजार ९५५ तर दूरदर्शी पार्टीचे ज्ञानदेव चौधरी यांना १ हजार ३९५ मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये १३ उमेदवारांनी अपक्ष म्हणून लढा दिला.