शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

खाजगी मालमत्तांवरही डोळा

By admin | Updated: November 28, 2014 01:17 IST

औरंगाबाद : महापालिकेने २०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी अब्जावधी किमतीच्या मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत.

औरंगाबाद : महापालिकेने २०० कोटी रुपयांच्या कर्जासाठी अब्जावधी किमतीच्या मालमत्ता आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवल्या आहेत. त्या मालमत्तांची किंमत कमी असल्यामुळे बँकेकडे आणखी १३ मालमत्ता गहाण ठेवण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, त्यामध्ये काही खाजगी मालमत्ताही गहाण ठेवण्यात येत असल्याचा आक्षेप नागरिक नोंदविण्यास पुढे आले आहेत.मनपाने आक्षेपांसाठी ७ दिवसांची मुदत दिली असून, आज दिवसभरात बँकेकडे अनेकांनी आक्षेप नोंदविण्याबाबत सर्वांशी चर्चा केली. नाथ सुपर मार्केट गहाण ठेवणे इतके मनपाला सोपे नाही. कारण ती जागा पालिकेने भाडे करारावर दिलेली आहे. तसेच शहरातील काही मोकळे भूखंडही मनपाने गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यापैकी क्रांतीचौक येथील सर्व्हे नं. ५४ मधील जागेवर नागरिकांची घरे आहेत. ती जागाही मनपाने बँकेकडे गहाण ठेवण्याबाबत प्रगटन देऊन आक्षेप मागविले आहेत. सर्व्हे नं. ५४ क्रांतीचौक येथील ८५०९.३४ चौ.मी. जागेप्रकरणी अनेक कोर्टप्रकरणे झालेली आहेत. त्यानंतरही जागेच्या मालकीचा वाद अजून मिटलेला नाही. ती पूर्ण ९ एकर जागा आहे. तेथे २४ घरे असून ती जागा मनपा गहाण ठेवण्याच्या तयारीत आहे. पालिकेच्या या झोपेत धोंडा घालण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, ते बँकेकडे आक्षेप नोंदविणार आहेत. जागा गहाण ठेवण्याची माहिती बाहेर येताच पहिला आक्षेप समोर आला आहे. ती जागा कुणाच्या मालकीची आहे, याबाबत मनपाने मालमत्ता विभागाशी संपर्क केला असता संबंधित अधिकाऱ्याने माहिती घ्यावी लागेल, असे उत्तर दिले. काय आहे जागेचे प्रकरण?क्रांतीचौक येथील सर्व्हे नं. ५४ मधील ९ एकर जागा निजामाने १९३७ ते १९४७ या काळात विकली. प्रतापनगरपर्यंतच्या जागेचा त्यामध्ये समावेश होता. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यानंतर ही जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात गेली. १९५४ चे खासरापत्र आणि १९६० मधील सातबाऱ्यावर जागेच्या मालकीप्रकरणी स्पष्ट उल्लेख आहे. १९६६ साली नगरपालिकेची स्थापना झाली. मनपाकडे जागेचे पीआरकार्ड नाही. त्यामुळे मनपा त्या जागेची मालक होऊ शकत नाही. या प्रकरणी नागरिकांनी तालुका भूमिअभिलेख, जिल्हाधिकाऱ्यांकडे बाजू मांडली. असे असताना मनपा जर ती जागा गहाण ठेवण्याचा प्रयत्न करीत असेल, तर न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, असे विपीन गुजरानी यांनी सांगितले.