शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव

By admin | Updated: June 8, 2014 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना अंबड तालुक्यातील आपेगाव येथे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेली ‘मिनरल वॉटर’ योजना केवळ कमी वीज दाबामुळे बंद आहे.

संजय कुलकर्णी , जालनाअंबड तालुक्यातील आपेगाव येथे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेली ‘मिनरल वॉटर’ योजना केवळ कमी वीज दाबामुळे बंद आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’च्या २९ जूनच्या अंकातून प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणेने तात्काळ सदर योजनेसाठी एक्स्प्रेस फिडरचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. या गावातील सर्वच विहिरींचे पाणी दूषित असल्याने ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागत होते. परिणामी, जलजन्य आजार मोठ्या प्रमाणावर पसरत होते. मात्र जिल्हा परिषदेने या गावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्याचा निर्णय ग्रामसभेच्या संमतीने घेतला. त्यासाठी वॉटर लाईफ इंडिया प्रा.लि. सिकंदराबाद या एजन्सीमार्फत प्रायोगिक तत्त्वावर गुणवत्ता बाधित आपेगावात जलशुद्धीकरण सयंत्र बसविण्यात आले. त्यावर १६ लाख २१ हजार ७६५ रुपयांचा खर्चही करण्यात आला. जानेवारी २०१३ पासून ही योजना गावात सुरू झाली खरी; परंतु ती दोन-तीन दिवसांतच बंद पडली. विजेचा दाब कमी असल्याने ही योजना बंद पडलेली आहे. सदर योजनेसाठी स्वतंत्र रोहित्र किंवा एक्स्प्रेस फिडरची गरज असल्याचे ‘लोकमत’ च्या वृत्तातून नमूद करण्यात आले होते.दरम्यान, या वृत्तानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरसाठी २.९० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता कदम यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, सदर प्रस्तावास मंजुरीसाठी तो तातडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात येणार आहे. गावातील कुटुंबियांना प्रतिव्यक्ती याप्रमाणे जेवढे पाणी लागेल, त्यांनी ते योजनेच्या ठिकाणावरून घेऊन जायचे. ३ रुपयांमध्ये २० लिटर पाणी याप्रमाणे ‘मिनरल वॉटर’ चे दर ठरविण्यात आले. योजनेसाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने करायची. तर १० वर्षांसाठी देखभाल दुरूस्ती सदर एजन्सीने करावी, असे यासंबंधी झालेल्या कराराद्वारे ठरविण्यात आले.