शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका

By admin | Updated: September 12, 2014 00:32 IST

औरंगाबाद : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहरातील आठ भाविकांची लष्कराने सुखरूप सुटका केली.

बालाजी आडसूळ, कळंबदोन वर्षापासून कळंब पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे प्रलंबित असलेली महाग्रारोहयोमधील पशुधन निवाऱ्याची कामे अखेर मार्गी लागली असून पंचायत समिती स्तरावर प्रति पाच याप्रमाणे ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी १६० कामे प्रत्यक्षात प्रगतीपथावर आहेत. पं. स. प्रशासनाला उशिरा का होईना जाग येऊन मुक्या जनावरांना हक्काचा सुस्थितीत निवारा देणारी ही कामे मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान होत आहे. केंद्र शासनाने ४ मे २०१२ रोजी एक मार्गदर्शक सूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांच्या काही वैयक्तिक लाभाची काही कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या नियोजन विभागाने महाग्रारोहयोतून करावयाच्या अनुज्ञेय कामात पशुधन निवारा, कुक्कुट व शेळी पालन शेड, अमृतपाणी खड्डा, नॅडॅप आदी २९ महत्वपूर्ण कामांचा समावेश केला होता. शेतीसाठी तसेच दुग्धव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पशुधन जोपासण्यात येते. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांकडे पक्क्या निवाऱ्याची वाणवा होती. त्या अनुषंगाने तालुक्यातून ३३९८ इतक्या विक्रमी संख्येने कळंब पं. स. कडे पशुधन निवाऱ्याचे प्रस्ताव आले होते. परंतु दोन वर्षात या प्रस्तावाला दफ्तर दिरंगाईचा फटका बसून साधी प्रशासकीय अथवा तांत्रिक मान्यताही न मिळाल्याने संबंधित शेतकरी परेशान झाले होते.या संदर्भात लोकमतमधून आवाज उठविण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. त्यानंतर मागील काही दिवसात तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाच्या प्रस्तावावरील अखेर धूळ झटकल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. १६० कामे प्रगतीपथावर ४प्रस्तावाची गावनिहाय संख्या मोठी असल्याने प्रति ग्रामपंचायत पाच याप्रमाणे पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून पंधरा दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार तालुक्यातील विविध गावात पालक तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली १६० पशुधन निवाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही शेतकऱ्यांच्या पशुधन निवाऱ्याची कामे पूर्णत्वास आली असून या कामामुळे मुक्या जनावरांना बसण्यासाठी सिमेंट कॉक्रीट असलेला भुभाग समोर ऊन पावसापासून संरक्षण करणारी बारा फूट उंचीची विटाची भिंत, चारा खाण्यासाठी गव्हाण, पाण्याचा व मलमुत्राचा निचरा होईल, असा उतार व विल्हेवाटीची सोय वरतून स्टेनलेस स्टिलच्या पत्र्याचा छत असा पद्धतशीर आखीव, रेखीव स्वच्छ व खेळती हवा लाभलेला पक्का गोठा मिळाला आहे. यासाठी नवीन तांत्रिक व आर्थिक मापदंडानुसार प्रती गोठ्यास सत्तर हजाराच्या आसपास महाग्रारोहयो या योजनेतून खर्च केला जात आहे.