शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
4
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
5
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
6
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
7
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
8
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
9
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
10
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
11
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
12
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
13
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
14
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
15
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
16
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
17
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
18
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
19
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
20
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air

अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका

By admin | Updated: September 12, 2014 00:32 IST

औरंगाबाद : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहरातील आठ भाविकांची लष्कराने सुखरूप सुटका केली.

बालाजी आडसूळ, कळंबदोन वर्षापासून कळंब पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे प्रलंबित असलेली महाग्रारोहयोमधील पशुधन निवाऱ्याची कामे अखेर मार्गी लागली असून पंचायत समिती स्तरावर प्रति पाच याप्रमाणे ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी १६० कामे प्रत्यक्षात प्रगतीपथावर आहेत. पं. स. प्रशासनाला उशिरा का होईना जाग येऊन मुक्या जनावरांना हक्काचा सुस्थितीत निवारा देणारी ही कामे मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान होत आहे. केंद्र शासनाने ४ मे २०१२ रोजी एक मार्गदर्शक सूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांच्या काही वैयक्तिक लाभाची काही कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या नियोजन विभागाने महाग्रारोहयोतून करावयाच्या अनुज्ञेय कामात पशुधन निवारा, कुक्कुट व शेळी पालन शेड, अमृतपाणी खड्डा, नॅडॅप आदी २९ महत्वपूर्ण कामांचा समावेश केला होता. शेतीसाठी तसेच दुग्धव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पशुधन जोपासण्यात येते. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांकडे पक्क्या निवाऱ्याची वाणवा होती. त्या अनुषंगाने तालुक्यातून ३३९८ इतक्या विक्रमी संख्येने कळंब पं. स. कडे पशुधन निवाऱ्याचे प्रस्ताव आले होते. परंतु दोन वर्षात या प्रस्तावाला दफ्तर दिरंगाईचा फटका बसून साधी प्रशासकीय अथवा तांत्रिक मान्यताही न मिळाल्याने संबंधित शेतकरी परेशान झाले होते.या संदर्भात लोकमतमधून आवाज उठविण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. त्यानंतर मागील काही दिवसात तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाच्या प्रस्तावावरील अखेर धूळ झटकल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. १६० कामे प्रगतीपथावर ४प्रस्तावाची गावनिहाय संख्या मोठी असल्याने प्रति ग्रामपंचायत पाच याप्रमाणे पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून पंधरा दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार तालुक्यातील विविध गावात पालक तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली १६० पशुधन निवाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही शेतकऱ्यांच्या पशुधन निवाऱ्याची कामे पूर्णत्वास आली असून या कामामुळे मुक्या जनावरांना बसण्यासाठी सिमेंट कॉक्रीट असलेला भुभाग समोर ऊन पावसापासून संरक्षण करणारी बारा फूट उंचीची विटाची भिंत, चारा खाण्यासाठी गव्हाण, पाण्याचा व मलमुत्राचा निचरा होईल, असा उतार व विल्हेवाटीची सोय वरतून स्टेनलेस स्टिलच्या पत्र्याचा छत असा पद्धतशीर आखीव, रेखीव स्वच्छ व खेळती हवा लाभलेला पक्का गोठा मिळाला आहे. यासाठी नवीन तांत्रिक व आर्थिक मापदंडानुसार प्रती गोठ्यास सत्तर हजाराच्या आसपास महाग्रारोहयो या योजनेतून खर्च केला जात आहे.