शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटातून केवळ लष्करामुळे सुटका

By admin | Updated: September 12, 2014 00:32 IST

औरंगाबाद : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलेल्या शहरातील आठ भाविकांची लष्कराने सुखरूप सुटका केली.

बालाजी आडसूळ, कळंबदोन वर्षापासून कळंब पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे प्रलंबित असलेली महाग्रारोहयोमधील पशुधन निवाऱ्याची कामे अखेर मार्गी लागली असून पंचायत समिती स्तरावर प्रति पाच याप्रमाणे ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० कामांना मंजुरी देण्यात आली असून यापैकी १६० कामे प्रत्यक्षात प्रगतीपथावर आहेत. पं. स. प्रशासनाला उशिरा का होईना जाग येऊन मुक्या जनावरांना हक्काचा सुस्थितीत निवारा देणारी ही कामे मार्गी लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान होत आहे. केंद्र शासनाने ४ मे २०१२ रोजी एक मार्गदर्शक सूचना काढून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांच्या काही वैयक्तिक लाभाची काही कामे हाती घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्याच्या नियोजन विभागाने महाग्रारोहयोतून करावयाच्या अनुज्ञेय कामात पशुधन निवारा, कुक्कुट व शेळी पालन शेड, अमृतपाणी खड्डा, नॅडॅप आदी २९ महत्वपूर्ण कामांचा समावेश केला होता. शेतीसाठी तसेच दुग्धव्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पशुधन जोपासण्यात येते. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांकडे पक्क्या निवाऱ्याची वाणवा होती. त्या अनुषंगाने तालुक्यातून ३३९८ इतक्या विक्रमी संख्येने कळंब पं. स. कडे पशुधन निवाऱ्याचे प्रस्ताव आले होते. परंतु दोन वर्षात या प्रस्तावाला दफ्तर दिरंगाईचा फटका बसून साधी प्रशासकीय अथवा तांत्रिक मान्यताही न मिळाल्याने संबंधित शेतकरी परेशान झाले होते.या संदर्भात लोकमतमधून आवाज उठविण्यात आला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले होते. त्यानंतर मागील काही दिवसात तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या ४१० प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामाच्या प्रस्तावावरील अखेर धूळ झटकल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. १६० कामे प्रगतीपथावर ४प्रस्तावाची गावनिहाय संख्या मोठी असल्याने प्रति ग्रामपंचायत पाच याप्रमाणे पहिल्या टप्प्यात मंजुरी देण्यात आली असून पंधरा दिवसात ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार तालुक्यातील विविध गावात पालक तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली १६० पशुधन निवाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही शेतकऱ्यांच्या पशुधन निवाऱ्याची कामे पूर्णत्वास आली असून या कामामुळे मुक्या जनावरांना बसण्यासाठी सिमेंट कॉक्रीट असलेला भुभाग समोर ऊन पावसापासून संरक्षण करणारी बारा फूट उंचीची विटाची भिंत, चारा खाण्यासाठी गव्हाण, पाण्याचा व मलमुत्राचा निचरा होईल, असा उतार व विल्हेवाटीची सोय वरतून स्टेनलेस स्टिलच्या पत्र्याचा छत असा पद्धतशीर आखीव, रेखीव स्वच्छ व खेळती हवा लाभलेला पक्का गोठा मिळाला आहे. यासाठी नवीन तांत्रिक व आर्थिक मापदंडानुसार प्रती गोठ्यास सत्तर हजाराच्या आसपास महाग्रारोहयो या योजनेतून खर्च केला जात आहे.