शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 23:41 IST

जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होणे शक्य आहे़, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे असून, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होणे शक्य आहे़, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले़स्वातंत्र्य दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले़ यावेळी संदेशपर भाषणात ते बोलत होते़ यावेळी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, मनपा आयुक्त राहुल रेखावार, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, खा़बंडू जाधव, आ़मोहन फड, आ़डॉ़राहुल पाटील, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते आदींची उपस्थिती होती़पाटील म्हणाले, शेतकºयांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत आहे़ नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी असो की शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी राबविलेली जलयुक्त शिवार योजना असो, सर्वच पातळीवर शेतकरी आणि सामान्य जनतेच्या विकासाला अग्रक्रम दिला जात आहे़ विकासाभिमूख जिल्हा म्हणून परभणीची ओळख आहे़ विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून भविष्यात जिल्ह्याचा अधिक विकास करण्यासाठी आपण अग्रेसर राहू, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला़ सध्या पावसाने ताण दिल्यामुळे पीक परिस्थिती चांगली नाही़ पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपण वेळोवेळी आढावा घेत आहोत़ शेतकºयांनी चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे़, असे ते म्हणाले़ स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या महान नेत्यांना व स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन करून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली़ ध्वजवंदनेनंतर पाटील यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत जनजागृतीसाठी तयार केलेल्या डिजिटल चित्ररथालाही पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविला़ कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़