शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विद्यापीठात होणार कार्यक्रम

By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST

औरंगाबाद : ‘भारतीय सायन्स काँग्रेस’च्या धर्तीवर औरंगाबादेत जानेवारी महिन्यामध्ये ‘महाराष्ट्र सायन्स काँग्रेस’चे आयोजन केले जाणार आहे.

औरंगाबाद : ‘भारतीय सायन्स काँग्रेस’च्या धर्तीवर औरंगाबादेत जानेवारी महिन्यामध्ये ‘महाराष्ट्र सायन्स काँग्रेस’चे आयोजन केले जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यासंदर्भात ‘भारतीय सायन्स काँग्रेस’चे अध्यक्ष तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठात आढावा घेण्यात आला. डॉ. निमसे यांच्या पुढाकाराने ३ ते ७ जानेवारीदरम्यान मुंबई विद्यापीठात १०२ वी भारतीय सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील विद्यापीठांना या काँग्रेसमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. या अनुषंगाने डॉ. निमसे यांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे, कुलसचिव डॉ. धनराज माने, डॉ. कारभारी काळे, सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन्सचे संचालक डॉ. यशवंत खिल्लारे, ‘आय क्वॅक’चे संचालक डॉ. वि.ल. धारूरकर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रत्नदीप देशमुख यांच्यासह रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंजली राजभोज, डॉ. एम.डी. सिरसाट, डॉ. महादेव मुळे, डॉ. सूर्यभान सनान्से, डॉ. सुनीती बर्वे, डॉ. एम.एम. फावडे, डॉ. एम.बी. ढाकणे, डॉ. प्रवीण वक्ते, डॉ. अनिल घुले, डॉ. सुरेश गायकवाड, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. जी.आर. मंझा आदी उपस्थित होते. औरंगाबादेत होणाऱ्या या परिषदेत महाराष्ट्रातील विद्यार्थी व सर्वसामान्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या हेतूने नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्याचा मानस कुलगुरू डॉ. चोपडे यांनी व्यक्त केला. परिषदेसाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जातील, असा विश्वास कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईअगोदर औरंगाबादसाठी प्रयत्न यासंदर्भात डॉ. एस.बी. निमसे म्हणाले की, जगात जे जे चांगले आहे त्याचा लाभ मराठवाड्यातील विद्यार्थी व संशोधकांना व्हावा, यासाठी मुंबई येथे होणाऱ्या सायन्स काँग्रेसच्या आधी औरंगाबादेत महाराष्ट्र सायन्स काँग्रेस व्हावी, असे प्रयत्न आहेत. सायन्स काँग्रेसला येणारे काही स्कॉलर औरंगाबादेत आणावेत, तसेच सायन्स काँग्रेसमधील काही महत्त्वाचे कार्यक्रम, व्याख्याने टेलिकास्ट करून औरंगाबादेत दाखवावेत, असा विचार आहे.