शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच

By admin | Updated: October 4, 2014 23:55 IST

औरंगाबाद : नवरात्रोत्सवात फुलांच्या भावाने शंभरी गाठली होती. मात्र, दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच दिसून आला. शहरात दररोज ८ ते ९ टन फुलांची मागणी असते.

औरंगाबाद : नवरात्रोत्सवात फुलांच्या भावाने शंभरी गाठली होती. मात्र, दसऱ्यानंतरही फुलांचा भाव चढलेलाच दिसून आला. शहरात दररोज ८ ते ९ टन फुलांची मागणी असते. मात्र, शनिवारी २ ते ३ टनच फुले बाजारात आल्याने चढ्या दरातच फुलांची विक्री झाली. जून महिन्यात झेंडूची लागवड होत असते. मात्र, यंदा महिनाभर उशिराने पावसाने हजेरी लावली. परिणामी, बहुतांश ठिकाणी झेंडूची लागवड झाली नाही. ज्या शेतातील विहिरीत पाणी आहे, तेथील शेतकऱ्यांनीच झेंडूची लागवड केली. यामुळे दरवर्षीपेक्षा निम्म्याने उत्पादन कमी झाले. दरवर्षी औरंगाबादेत दौलताबाद, वेरूळ, गांधेली, पिसादेवी, पोखरी, सावंगी, कोलठाणा या परिसरातून झेंडूची आवक होत असते. याशिवाय हिंगोली, जिंतूर, जळगाव, नेवासा, नगर आदी भागातूनही झेंडू शहरात आणला जातो. मात्र, परजिल्ह्यांमधून यंदा झेंडूची आवक नगण्य झाली. परिणामी, शहरात मागणीच्या तुलनेत कमी आवक झाल्याने झेंडूचे भाव कडाडले होते. दसऱ्याच्या दिवशी ५० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत झेंडू विक्री झाला. झेंडूला चांगला भाव मिळाल्याने विक्रेते खुश झाले होते. कारण, शेतकऱ्यांकडून ४० रुपये किलोने खरेदी केलेल्या झेंडूची दुप्पट भावाने विक्री झाली. यात शेतकऱ्यांचा नव्हे, तर विक्रेत्यांचा फायदा झाला. मात्र, काही शेतकऱ्यांनी स्वत: गजानन महाराज मंदिर परिसर, गारखेडा, शिवाजीनगर, जालना रोड, हर्सूल टी पॉइंट, टीव्ही सेंटर चौकात झेंडू विकला, त्यांना फायदा झाला. झेंडू महागल्याने किलोभर फूल खरेदी करणारे अर्धा किलो किंवा पावशेर खरेदी करण्यातच धन्यता मानत होते. दसरा संपल्यानंतर शनिवारी मागणी कमी झाल्याने झेंडू व अन्य फुलांचे भाव कमी होतील, असा अंदाज होता; पण तसे झाले नाही. आजही झेंडू अडत बाजारात ७० ते ८० रुपये किलोनेच विक्री झाला.