शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

‘नगर भूमापन’ च्या स्थापनेला मुहूर्त मिळेना

By admin | Updated: November 5, 2014 00:57 IST

संजय कुलकर्णी , जालना उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाअंतर्गत नगर भूमापन कार्यालय स्थापनेसाठी शासनाने १७ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला सुमारे एक-दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली

संजय कुलकर्णी , जालनाउपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाअंतर्गत नगर भूमापन कार्यालय स्थापनेसाठी शासनाने १७ कर्मचाऱ्यांच्या स्टाफला सुमारे एक-दीड वर्षांपूर्वीच मंजुरी दिली. परंतु अद्यापही या कार्यालयाची स्थापना न झाल्याने शहरातील मालमत्ताधारकांची कामांसाठी मोठी ससेहोलपट होत आहे.येथील प्रशासकीय इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील जागेचे मोजमाप, नामांतर, नक्कलची प्रत देणे, खरेदीचे व वाटणी फेर देणे इत्यादी कामे या कार्यालयामार्फत होतात. कार्यालय प्रमुखांकडे अंबड तालुक्याचाही अतिरिक्त पदभार आहे. तीन हजार मालमत्ताधारकांच्या मागे एक परिरक्षण भूमापक असणे आवश्यक आहे. परंतु या कार्यालयात केवळ ३ परिरक्षण भूमापक कार्यरत आहेत.शहरात ५८ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यामुळे परिरक्षण भूमापकांची संख्या अधिक असणे गरजेचे आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी भूमी अभिलेख कार्यालयाने शासनाकडे नगरभूमापन कार्यालयाच्या स्वतंत्र कार्यालयासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठी आवश्यक स्टाफच्या संख्येचाही त्यात समावेश होता. त्यानुसार शासनाने एक-दीड वर्षांपूर्वीच स्टाफला मंजुरी दिल्याचे समजते. त्यात नगर भूमापन अधिकारी, ९ परिरक्षण भूमापक, २ मोजणी अधिकारी, ५ शिपाई यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हा भूमीअभिलेख अधीक्षक इंदलकर यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, नगर भूमापन कार्यालयाच्या स्वतंत्र कार्यालयासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविलेला आहे. परंतु स्टाफ मंजुरीचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत.उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात दोन-तीन अपवाद वगळता अधिकारी, कर्मचारी गैरहजर आढळतात. याबाबत स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्यानंतरही फारसा परिणाम झालेला नाही. लोकांची कामे या कार्यालयात लवकर होत नाहीत. ४अनेकवेळा चकरा मारून देखील उपयोग होत नसल्याने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी काही व्यक्तींनी या कार्यालयात कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला होता.