शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

९ हजारांची लाच घेताना अभियंता, लाईनमन जाळ्यात

By admin | Updated: June 19, 2014 00:53 IST

औरंगाबाद : वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ९ हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

औरंगाबाद : वीज जोडणी देण्यासाठी शेतकऱ्याकडून ९ हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई अजिंठा- सिल्लोड रोडवरील हॉटेल राजेंद्र येथे दुपारी ४ वाजता करण्यात आली.कनिष्ठ अभियंता विजय गणेश काथार (३२), रा. म्हसोबानगर, हर्सूल आणि लाईनमन जगन्नाथ शंकर वाणी (४७), रा. चिंचखेडा, ता. सिल्लोड यांना अटक झाली आहे. दोन्ही आरोपी महावितरण कंपनीच्या सिल्लोड ग्रामीण शाखा येथे कार्यरत आहेत. केऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील शेतकऱ्याने त्याच्या शेतात वीज जोडणीसाठी मे २०१२ मध्ये महावितरणकडे रीतसर अर्ज केला होता. तुमची जोडणी दोन-तीन महिन्यांत होईल, असे त्यांना मोघम सांगितले जात होते म्हणून शेतकरी विजय काथार यांना भेटल्यावर त्यांनी ९ हजार रुपये मागितले. त्यांना पैसे घेऊन बुधवारी दुपारी हॉटेल राजेंद्र येथे येण्यास सांगितले. शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. पोलिसांनी दुपारी सापळा लावला. काथार यांनी लाचेची रक्कम लाईनमन वाणी यांच्याकडे देण्याचे सांगितले. त्यावेळी वाणी यांनी शेतकऱ्यास जोडणीसोबत मीटर बसवावे लागेल यासाठी आणखी हजार रुपये मागितले, अशी एकूण ९ हजार रुपयांची लाच वाणी यांनी घेतली. लाच घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याविरुद्ध सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत होता. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रामनाथ चोपडे, किशोर पवार, प्रमोद पाटील, सुधाकर मोहिते, कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, अजय आवले, नितीन घोडके, शेख मतीन यांचा सहभाग होता.