शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

अपक्षांचीही ताकद पणाला...

By admin | Updated: October 3, 2014 00:31 IST

गजेंद्र देशमुख , जालना या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु, हे अपक्ष उमेदवार मतदारांवर मोठा प्रभाव टाकतील, असे चिन्हे नसली तरी,

गजेंद्र देशमुख , जालनाया जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परंतु, हे अपक्ष उमेदवार मतदारांवर मोठा प्रभाव टाकतील, असे चिन्हे नसली तरी, या उमेदवारांनीही आपली ताकद पणाला लावली आहे.सर्वसाधारणपणे निवडणुकीत अपक्ष फार मोठी भूमिका पार पाडतात. परंतु या जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता अपक्ष उमेदवारांनी म्हणावी तेवढी कामगिरी केलेली दिसत नाही.लोकसभा निवडणुकीतसुध्दा १९५१ पासूनच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत फक्त ५० अपक्ष उमेदवारांनी विविध वेळी निवडणुक लढविली. काही अपवाद वगळता सर्वच निवडणुकांमध्ये अपक्षांच्या पारड्यात १० हजार मतांपेक्षा अधिक मते पडलीच नाहीत. किंबहूना टक्केवारी पाहता ५ टक्क्यांपेक्षा अधिक मतेही अपक्षांनी मिळविली नाहीत. निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवार मतांची विभागणी करण्यात मोठी भूमिका पार पाडतात. परंतु जालना जिल्ह्यात लोकसभेसह विधानसभेतसुध्दा अपक्षांचा दबाव काही जाणवलाच नाही. निवडणूक लढतांना ‘साम-दाम-दंड-भेद’ या नीतींचा वापर केला जातो. ओघानेच विरोधकांना धूळ चारण्यासाठी त्याच्या समाजाचा, त्याच्याच क्षेत्रातला ‘डमी’ उमेदवार उभा करून प्रतिस्पर्ध्याच्या मतांची विभागणी करण्याची कूटनिती आखण्यात येते. याव्यतिरिक्त काही इच्छूक उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरतात. त्यामुळेच अपक्ष उमेदवारांना मोठे महत्व प्राप्त होते.परंतू या निवडणुकीत तसे चित्रही जाणवत नाही. कारण महायुती व आघाडी दोन्हीही संपुष्टात आल्याच्या पार्श्वभूमीवरच मुळात सर्व मतदारसंघात उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातील निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या विविध पक्षांच्या इच्छूकांनी अंतिमक्षणी पक्षीय बंधने, वैचारिक बंधने वगैरे गुंडाळून अन्य पक्षात प्रवेश केला. उमेदवारी पटकावली व प्रचारयुध्दातही ते जुंपले. त्यामुळेच या पाचही मतदारसंघात अन्य कोणत्याही इच्छुकांनी बंडखोरीची भूमिका बजावली नाही. त्यास केवळ भोकरदन अपवाद. या मतदाररसंघात कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते एल. के. दळवी यांनी बंडखोरी केली. त्यापाठोपाठ कॉँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पठाण यांनीही बंडाचे निशाण फडकावले. हे दोघेही अन्य पक्षात न जाता स्वबळावर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हे दोघे कितपत शक्ती दाखवणार याविषयी उत्सूकता निर्माण झाली आहे. एकूण या जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या विविध निवडणुकांध्ये शेकडो अपक्ष उमेदवार होते. काही अपवाद वगळता त्यांना ५ हजारपेक्षा अधिक मते मिळाली नाहीत. अपक्ष उमेदवारांची संख्या वाढत असली तरीही ते मतदारांवर प्रभाव पाडू शकले नाहीत. मात्र, मतविभागणीत त्यांनी मोठा हातभार लावला.