शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

शहरातील विजेचे तीन महिन्यांनी पुन्हा खाजगीकरण?

By admin | Updated: November 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : शहर आणि परिसरातील वीज बिल वसुलीसाठी तीन महिन्यांनी पुन्हा एक खाजगी कंपनी अवतरणार असून या कंपनीला योग्य ‘ग्राऊंड’ तयार

औरंगाबाद : शहर आणि परिसरातील वीज बिल वसुलीसाठी तीन महिन्यांनी पुन्हा एक खाजगी कंपनी अवतरणार असून या कंपनीला योग्य ‘ग्राऊंड’ तयार करून देण्याच्या उद्देशाने महावितरणने वीज बिल वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असल्याची माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली. शहरातील नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देऊन छळणाऱ्या जीटीएलने आपला गाशा गुंडाळला. जीटीएलमध्ये पूर्वी काम करीत असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांकडे मोठी थकबाकी दर्शविण्यात येत असली तरी ती कंपनी जाताना मोठ्या फायद्यातच राहिली आहे. जीटीएलने मागील तीन- चार महिन्यांपासूच गाशा गुंडाळण्याची तयारी केली होती. त्यामुळे अनेक नागरिकांना जास्तीची बिले धाडल्याच्या तक्रारी आहेत. या बिलांबाबतच्या तक्रारी जीटीएलने घेतल्या. मात्र, त्यांचे निराकरण केले नाही. सदोष मीटर, जास्तीची बिले लावणे, बिलाबाबतीतले वाद न सोडविणे, असे प्रकार जाता जाता जीटीएलने केले आहेत. यामुळे अनेक नागरिकांनी वीज बिले भरलेले नाही. शहरातील नागरिकांकडे जीटीएलची वीज बिलांची सुमारे १५० कोटी रुपये थकबाकी असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात येते. प्रत्यक्षात हा आकडा १३४ कोटी रुपयांचा आहे, असे महावितरणमधील कर्मचारी सांगतात. एवढी मोठी असणारी ही थकबाकी तीन महिन्यांच्या आत वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी नागरिकांकडे तगादा लावला आहे. सदोष मीटर किंवा अव्वाच्या सव्वा वीज बिलाची वसुली महावितरणचे कर्मचारी करू पाहत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आगामी तीन महिन्यांच्या काळात जीटीएलच्या जागी दुसरी खाजगी कंपनी येणार असल्याचे महावितरणचे कर्मचारीच ठामपणे सांगतात. त्या कंपनीच्या अटीनुसार नागरिकांकडे असणारी बिले पूर्णपणे वसूल होणे आवश्यक आहे. ‘शून्य थकबाकी’ या अटीवरच नवीन कोणतीही कंपनी येणार असून त्यादृष्टीने ‘ग्राऊंड’ तयार करून देण्याची जबाबदारी महावितरणने उचलली आहे. यामुळे नागरिकांचे वीज कनेक्शन कापण्याची तयारी महावितरणने केली आहे. ४काही नागरिकांकडे एकापेक्षा जास्त मीटर आहेत. यापैकी काही मीटरचे रीडिंग अधिक येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतची तक्रार करणारी निवेदनेही नागरिकांनी जीटीएलला दिलेली आहेत. ४मात्र, आता पुन्हा आलेले महावितरण सदोष मीटर असणाऱ्या ग्राहकांकडूनही जीटीएलने लावलेली रक्कम वसूल करू पाहत आहे, त्यामुळे महावितरणविरुद्धही नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ४सुमारे दीडशे कोटींची ही थकबाकी अर्थातच फुगलेला आकडा असल्याचे आता महावितरणचे कर्मचारी मान्य करीत आहेत. जीटीएलने अधिक फायद्यासाठी अव्वाच्या सव्वा बिले लावल्याची नागरिकांची तक्रार आहे. ४अर्थात, वीज बिलाच्या वसुलीचे अवघड काम महावितरणने करायचे आणि पुन्हा तीन महिन्यांनंतर खाजगी कंपनीने ताबा घ्यायचा यामुळेही महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. वीज बिल वसुलीवर ‘इन्सेन्टिव्ह’ (विशेष भत्ता) मिळावा, असे कर्मचाऱ्यांना वाटत आहे. नागरिकांकडील थकबाकीपैकी सुमारे ३० ते ४० टक्के वीज बिल अधिकचे लावलेले असल्याच्या तक्रारी आहेत.