शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या..!

By admin | Updated: September 9, 2014 23:58 IST

हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला.

हिंगोली : शेतकऱ्यांना बांधावरच आधुनिक तंत्रज्ञान मिळावे, या कृषी चिकित्सालयाच्या मूळ उद्देशालाच कृषी विभागाने हारताळ फासला. गतवर्षी लाखो रूपये खर्च करूनही ३०० एकरात २८६ क्विंटलाचे नाममात्र उत्पादन निघाले. आजघडीला चिकित्सालयाच्या जमिनीत सध्याचे तण पाहता यंदाही ‘दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ’ उद्भवण्याची शक्यता नकारता येत नाही. परिणामी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कृषी विभागाचीच ही बोंब असेल तर इतरांनी त्यांचे सल्ले ऐकले तर ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ ही बोंब होईल.देशाची अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतीवर अवलंबून असल्याने कृषी विभागाला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झाले. स्थानिक ठिकाणीच उत्पादकांना शेतीबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हा कृषी विभागात शेतकऱ्यांच्या राबता असतो. याहीपुढे जाऊन शासनाने उत्पादकांना बांधावरच तंत्रज्ञान मिळावे, या उद्धेशाने कृषी चिकित्सालयाची स्थापना केली. जिल्ह्यात त्यानुसार हिंगोली, बासंबा, आखाडा बाळापूर, वसमत आणि गोळेगावात चिकित्सालयाच्या जमिनी आहेत. त्यावर विविध प्रात्यक्षिके करता यावीत, अधिकाऱ्यांना स्व अनुभव घेऊन तो शतेकऱ्यांना सांगता यावा, अधिकाअधिक उत्पादन काढून उत्पादकांना दाखविता यावे, शेतकऱ्यांनाही ते उघड्या डोळ्याने पाहता यावे आणि त्यातून बियाणे तयार करण्यासाठी उत्पादनही घेता यावे, या उद्देशासाठी या जमिनी महत्त्वाच्या आहेत; परंतु यातील एकही उद्देश साध्य होताना दिसत नाही. मागील वर्षी केवळ २८६ क्विंटल उत्पादन ३०० एकरात निघाले. एकाही ठिकाणी समाधानकारकच नव्हे तर सांगण्याजोगाही उतार आलेला नाही. हरभऱ्याचे एकूण उत्पादन ३ क्विंटल झाल्याची नोंद कृषी विभागात सापडते. पैैशांची, तंत्रज्ञानाची आणि वेळेची कमतरता नसतानाही प्रत्येक ठिकाणी तणाने शेत खाल्ले. बहुतांश अधिकाऱ्यांचे परजिल्ह्यातून अपडाऊन असल्याने बाहेरगावच्या ठिकाणची पिके पाहण्यासाठी कदाचित अधिकाऱ्यांना वेळ नसवा; पण जिल्हा कार्यालयाच्या पाठीमागील पीकही त्यांना दिसत नाही, हे विषेश. (वार्ताहर)जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी हे काम पाहतात म्हणून त्यांच्याकडे बोट दाखविले. तद्नंतर उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी बाहेरगावी असून गत वर्षी नव्हतो, म्हणून हात वर केले.