शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

निधीअभावी ९ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: November 25, 2014 00:58 IST

संजय कुलकर्णी , जालना ग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ निधीअभावी या योजना बंद असून त्यासाठी टँकरवर खर्च सुरू आहे. सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असून काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठ््याची सोय व्हावी, म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. परंतु त्यापैकी ९ योजना केवळ निधीअभावी अनेक दिवसांपासून बंद आहे. जमिनीतील पाणीपातळी कमी झाल्यास टँकरच्या पाण्यावरच या ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.या नऊ गावांमध्ये भोकरदन तालुक्यातील आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, अंबड तालुक्यातील रेणापुरी, कर्जत, मंठा तालुक्यातील माहोरा व परतूर तालुक्यातील बामणी, कावजवळा, वलखेडा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, रेणापुरी, कर्जत आणि कावजवळा येथील योजना देखभाल दुरूस्तीअभावी बंद आहे. तर पुरेशा पाण्याचा उदभव नसल्याने माहोरा, बामणी व वलखेडा येथील योजना बंद आहेत.या योजनांच्या दुरूस्तीसाठी सरासरी ५४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. परंतु अद्याप निधी न मिळाल्याने सदरील योजना सुरू झालेल्या नाहीत.४जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. त्यातील १०१९ योजना सुरू आहेत. परंतु २६२ गावे व वाड्यांमध्ये अद्याप नळयोजनांची कामे झालेली नाहीत. आगामी काळात ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.४यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांना विचारणा केली असता सदरील नऊ योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार यांच्याकडे त्यासाठी ५४ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचेही तांगडे यांनी सांगितले.