शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

निधीअभावी ९ पाणीपुरवठा योजना बंद

By admin | Updated: November 25, 2014 00:58 IST

संजय कुलकर्णी , जालना ग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.

संजय कुलकर्णी , जालनाग्रामीण भागात राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत ९ कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना बंद असून तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. विशेष म्हणजे केवळ निधीअभावी या योजना बंद असून त्यासाठी टँकरवर खर्च सुरू आहे. सध्या ग्रामीण भागात दुष्काळाची स्थिती असून काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठ््याची सोय व्हावी, म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. परंतु त्यापैकी ९ योजना केवळ निधीअभावी अनेक दिवसांपासून बंद आहे. जमिनीतील पाणीपातळी कमी झाल्यास टँकरच्या पाण्यावरच या ग्रामस्थांना तहान भागवावी लागत आहे.या नऊ गावांमध्ये भोकरदन तालुक्यातील आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, अंबड तालुक्यातील रेणापुरी, कर्जत, मंठा तालुक्यातील माहोरा व परतूर तालुक्यातील बामणी, कावजवळा, वलखेडा या गावांचा समावेश आहे. त्यापैकी आन्वा, गोषेगाव, पळसखेडा मूर्तड, रेणापुरी, कर्जत आणि कावजवळा येथील योजना देखभाल दुरूस्तीअभावी बंद आहे. तर पुरेशा पाण्याचा उदभव नसल्याने माहोरा, बामणी व वलखेडा येथील योजना बंद आहेत.या योजनांच्या दुरूस्तीसाठी सरासरी ५४ लाखांचा निधी अपेक्षित आहे. परंतु अद्याप निधी न मिळाल्याने सदरील योजना सुरू झालेल्या नाहीत.४जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम १०२८ नळयोजनांची कामे झालेली आहेत. त्यातील १०१९ योजना सुरू आहेत. परंतु २६२ गावे व वाड्यांमध्ये अद्याप नळयोजनांची कामे झालेली नाहीत. आगामी काळात ही कामे हाती घेण्यात येणार असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले.४यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.एन. तांगडे यांना विचारणा केली असता सदरील नऊ योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालक सचिव राजेशकुमार यांच्याकडे त्यासाठी ५४ लाखांच्या निधीची मागणी करण्यात आल्याचेही तांगडे यांनी सांगितले.