शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

दुष्काळाने लातुरच्या दाळ उद्योगाची उलाढाल २५ टक्क्यांनी घटली

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

सितम सोनवणे, लातूर दाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे

सितम सोनवणे, लातूरदाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ४५ ते ५० लाख क्विंटल डाळीचे उत्पादन यंदा यात २५ टक्क्याने घटून ३० ते ३५ लाख क्विंटलवर जात आहे. यात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. ऐन मोसमात तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या दाल मिलपैकी आता ७० टक्के मिल एका शिफ्टवर आल्या आहेत. दाळ आणि लातूरचे नाते अतूट आहे. लातूरची तूर आणि चना दाळ तर देशात प्रसिध्द होती. एका काळात विकसित झालेल्या या उद्योगात सध्या ८० ते ८५ दाल मिल एकट्या लातूर शहरात आहेत. जिल्हाभरातील हा आकडा १३० च्या घरात आहे. खरिपाने झटका दिला अणि रबीच्या पेरणीतही पावसाअभावी अनिश्चितता आली. त्यामुळे तूरीच्या उत्पादनात घट आणि हरभऱ्याचा पेरा ०.१ टक्क्यावर आला आहे. यंदा कर्नाटकातूनही होणारी तुरीची आवक रोडावली आहे. तिथूनही फक्त मुग, उडीदाचीच आवक वाढली आहे. तूर व हरभऱ्यासाठीही बाहेरच्या जिल्ह्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. परंतु बाहेरही तूर आणि हरभऱ्याचे उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यात होणारी अडीच लाख हेक्टर्स क्षेत्रावर तूर तर साडेतीन लाख हेक्टर्सवर हरभऱ्याची लागवड मंदावली आहे. याचा फटका दाय उत्पादनाला बसला आहे. लातूर जिल्ह्यातून जवळपास ४५ लाख क्विंंटल दाळ उत्पादीत केली जाते़ याचा फटका मिलचालकांना बसला असून एकट्या लातूर शहरात ७ ते ८ मिलना कुलूूप लावण्याची वेळ आली आहे. जिल्हाभरात हा आकडा २० च्या घरात जातो आहे. दररोज तीन - तीन शिफ्टवर चालणाऱ्या दाळ मिलमधील ६० ते ७० टक्के दाळ मिल या एका शिफ्टवर आल्या असल्याची माहिती हाती आली आहे. लातूरमध्ये ८५ तर उदगीरमध्ये ४० डाळ मिल आहेत़ या दालमिलच्या माध्यमातून दररोज सरासरी १५ हजार ते २० हजार क्विंटल तूर व हरभरा डाळीचे उत्पन्न घेतले जाते़ त्यातही तुरीचा अधिक वाटा होता़ पण सध्यस्थितीत मुग व उडीद यांची आवक असल्याने १० हजार क्विंटलपेक्षाही कमी उत्पादन होत आहे़ या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम हा मनुष्यबळ तसेच एकूण सर्वच यंत्रणेवर होत असल्याने आर्थिक गती मंदावत असल्याचेही डाळ मील मालकांकडून सांगण्यात येत आहे़