शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दुष्काळाने लातुरच्या दाळ उद्योगाची उलाढाल २५ टक्क्यांनी घटली

By admin | Updated: November 20, 2014 00:48 IST

सितम सोनवणे, लातूर दाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे

सितम सोनवणे, लातूरदाळ उद्योगामुळे देशभरात आपला ब्रॅन्ड निर्माण केलेल्या लातूर जिल्ह्याच्या उद्योजकांना यंदा दुष्काळजन्य परिस्थितीचा जोरदार फटका बसला आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरी ४५ ते ५० लाख क्विंटल डाळीचे उत्पादन यंदा यात २५ टक्क्याने घटून ३० ते ३५ लाख क्विंटलवर जात आहे. यात आणखी घट होण्याची चिन्हे आहेत. ऐन मोसमात तीन शिफ्टमध्ये चालणाऱ्या दाल मिलपैकी आता ७० टक्के मिल एका शिफ्टवर आल्या आहेत. दाळ आणि लातूरचे नाते अतूट आहे. लातूरची तूर आणि चना दाळ तर देशात प्रसिध्द होती. एका काळात विकसित झालेल्या या उद्योगात सध्या ८० ते ८५ दाल मिल एकट्या लातूर शहरात आहेत. जिल्हाभरातील हा आकडा १३० च्या घरात आहे. खरिपाने झटका दिला अणि रबीच्या पेरणीतही पावसाअभावी अनिश्चितता आली. त्यामुळे तूरीच्या उत्पादनात घट आणि हरभऱ्याचा पेरा ०.१ टक्क्यावर आला आहे. यंदा कर्नाटकातूनही होणारी तुरीची आवक रोडावली आहे. तिथूनही फक्त मुग, उडीदाचीच आवक वाढली आहे. तूर व हरभऱ्यासाठीही बाहेरच्या जिल्ह्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. परंतु बाहेरही तूर आणि हरभऱ्याचे उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यात होणारी अडीच लाख हेक्टर्स क्षेत्रावर तूर तर साडेतीन लाख हेक्टर्सवर हरभऱ्याची लागवड मंदावली आहे. याचा फटका दाय उत्पादनाला बसला आहे. लातूर जिल्ह्यातून जवळपास ४५ लाख क्विंंटल दाळ उत्पादीत केली जाते़ याचा फटका मिलचालकांना बसला असून एकट्या लातूर शहरात ७ ते ८ मिलना कुलूूप लावण्याची वेळ आली आहे. जिल्हाभरात हा आकडा २० च्या घरात जातो आहे. दररोज तीन - तीन शिफ्टवर चालणाऱ्या दाळ मिलमधील ६० ते ७० टक्के दाळ मिल या एका शिफ्टवर आल्या असल्याची माहिती हाती आली आहे. लातूरमध्ये ८५ तर उदगीरमध्ये ४० डाळ मिल आहेत़ या दालमिलच्या माध्यमातून दररोज सरासरी १५ हजार ते २० हजार क्विंटल तूर व हरभरा डाळीचे उत्पन्न घेतले जाते़ त्यातही तुरीचा अधिक वाटा होता़ पण सध्यस्थितीत मुग व उडीद यांची आवक असल्याने १० हजार क्विंटलपेक्षाही कमी उत्पादन होत आहे़ या दुष्काळजन्य परिस्थितीचा परिणाम हा मनुष्यबळ तसेच एकूण सर्वच यंत्रणेवर होत असल्याने आर्थिक गती मंदावत असल्याचेही डाळ मील मालकांकडून सांगण्यात येत आहे़