शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

दुष्काळामुळे आराखड्याच्या निधीला कात्री

By admin | Updated: February 6, 2015 00:55 IST

जालना : शासनाने राज्यातील दुष्काळामुळे जिल्हा वार्षिक आराखड्याला आर्थिक मर्यादा घातल्याने यंदा वाढीव निधी तर नाहीच

जालना : शासनाने राज्यातील दुष्काळामुळे जिल्हा वार्षिक आराखड्याला आर्थिक मर्यादा घातल्याने यंदा वाढीव निधी तर नाहीच, शिवाय गतवर्षीच्या आराखड्यापेक्षा १५ कोटींची कपात करणारा १३५.१६ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. याशिवाय २४१.०४ ओटीएस तसेच विशेष घटक योजनेसाठी ५६.६७ कोटींच्या तरतुदीचाही त्यात समावेश आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आ. नारायण कुचे, आ.अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. सुभाष झांबड, जि.प.अध्यक्ष तुकाराम जाधव, जिल्हाधिकरी ए.एस.आर. नायक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, तसेच विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडे सन २०१५-१६ साठी २७५ कोटी ६३ लाख रक्कमेचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. शासन परिपत्रकान्वये नियतव्ययाची सुधारित कमाल मर्यादेनुसार सन २०१५-१६ करीता सर्वसाधारण, विशेष घटक, आदिवासी उपाय या तिन्ही योजनांसाठी एकूण १९८ कोटी ३७ लाख रकमेची वित्तीय मर्यादेचा आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून सर्वसाधारण योजना अंतर्गत १३५ कोटी १६ लाख रुपये, ओटीएस करीता २४१ लक्ष रुपये, विशेष घटक योजना ५६ कोटी ६७ लक्ष रुपये अशा एकूण १९४ कोटी २४ लाख रुपये एवढ्या खर्चाच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली. (प्रतिनिधी)सभेमध्ये जालना शहरातील प्रश्नासंबंधी चर्चा झाली. नगरसेविका संध्या देठे यांनी शहरातील बंद पथदिव्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी तोडगा काढण्याची मागणी केली. शिरपूर बंधाऱ्यांच्या कामासाठी प्राप्त आठ कोटी रुपये पडून असून त्याच्या कामाचे आदेशही अद्याप दिलेले नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ४महिला स्वच्छतागृहासाठी जालना नगरपालिकेला २ कोटींचा निधी देण्याची मागणीही देठे यांनी केली.४जिल्हा परिषदेच्या सिंचन, आरोग्य विभागांचा निधी अद्याप अखर्चित राहिल्याबद्दल पालकमंत्री लोणीकर यांनी संबंधितांना ३१ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याची सूचना केली. जालना: जिल्ह्यात दुष्कळी परिस्थिती आहे. निधीची सांगड घालण्यासाठी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागतील असे मत पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले. डीपीडीसी बैठकीतनंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला.लोणीकर म्हणाले, वाळू, दगड खाण, मुरुम खाण आदींतून उत्पन्नाचे स्त्रोत वाढू शकतात. जिल्हा परिषद, नगर पालिका यांचे उत्पन्न वाढविण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात दगडाच्या ८६ खाणी आहेत. पैकी १४ खाणीच नियमित असल्याचे ते म्हणाले. दुष्काळासाठीही नियोजन सुरु आहे. चारा छावण्याच्या मुदा कॅबिनेट बैठकीत मांडणार असल्याचे स्पष्ट केले. फळबागांसाठी हेक्टरी २० हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दोन हेक्टर मोसंबी बागांना मदत करण्यासाठी ३ कोटी २८ लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. मोसंबी बागांना मल्चिंगसाठी १ कोटी १७ लाखांचे अनुदान मंजूर झाले. जालना : राज्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती भयावह आहे. जिल्ह्यात अनेक मानव विकास निर्देशांक तसेच इतर अनेक बाबीत मागासलेला आहे. असे असूनही गतवर्षी जिल्हा नियोजनासाठी असलेला १५० कोटींचा निधी १३५ कोटी देण्यात आला. म्हणजेच १५ कोटींनी कपात करण्यात आली आहे, हा निधी कपात करु नये असे स्पष्ट मत आ. राजेश टोपे यांनी व्यक्त केले. राज्य शासनाच्या नियोजनाअभावी झाल्याचे ते म्हणाले.नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकरांशी बोलत होते.६० टक्के निधीचीच तरतूद करण्यात आली आहे. जी अत्यल्प आहे. गतवर्षीचा मोठा निधी अखर्चितच आहे.राज्यशासनाचा नियोजनाअभावी हा निधी कमी मिळाला असल्याचा आरोप टोपे यांनी केला. रस्ते, शालेय इमारती, केटवेअर, दुग्धोव्यवसाय, प्राथमिक आरोग्य केंद्रे निधी अभावी रखडलेली आहेत. तर काही निधी असूनही कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहे. अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने निधी अखर्चित राहत आहे.सिंचनासाठी महत्वपूर्ण असलेल्या केटिवेअरला गेट बसविण्यासाठी शुन्य रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मागणी केल्यानंतर ० ते १०० हेक्टरच्या केटिवेअरसाठी ५० लाख तर दुग्धोव्यवसायासाठी २५ लाखांचा निधी देण्यात आल्याचे टोपे म्हणाले. भूसंपादाना सारख्या महत्वाच्या मुद्यासाठी फक्त १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे, ती अगदी तोकडी आहे. भूसंपादनाची अनेक प्रकरणी रखडली आहेत. पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांची खुर्ची तसेच इतर साहित्याची जप्ती होत आहे. जिल्ह्यात रस्त्याची स्स्थिती बिकट आहे, असे असूनही रस्त्याच्या कामासाठीही किरकोळ निधीची तरतूद करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी केला. गतवर्षी ३२ कोटी रुपयांची तरतूद होती. यंदा या निधीत कपात करुन १३.९२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. १२ आरोग्य केंद्राच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. काहींचे भूमिपूजनही झाले आहे. निधीही मंजूर आहे. असे असले तरी या इमारतींचे काम सुरु झालेले नाही. पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर टोपे यांनी ठपका ठेवला. ग्रामीण भागातील घंटागाड्यांसाठी पावणे दोन कोटींचा निधी मंजूर असूनही या गाड्या सुरु झालेल्या नाहीत.