शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

गोदावरी महामंडळाच्या दिरंगाईने मराठवाड्याच्या तोंडचे पाणी पळाले

By admin | Updated: November 26, 2014 01:12 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी निकाल देत वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.

सुनील कच्छवे , औरंगाबादमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी निकाल देत वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही प्राधिकरणाने आदेशित केले होते; परंतु महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी वेळकाढू भूमिका घेत त्याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागविले. त्याचाच फटका मराठवाड्याला बसला आहे. जायकवाडीच्या वरच्या भागात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांमध्ये बेकायदा अडविले जात आहे. हे पाणी मिळावे यासाठी मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलने होत आहेत. न्यायालयीन पातळीवरही मोठा लढा दिला गेला. त्याचाच भाग म्हणून पुढे हे प्रकरण महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेले. शेवटी प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी या प्रकरणात मराठवाड्याच्या बाजूने निकाल दिला. प्राधिकरणाने समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांमधील १५ आॅक्टोबर रोजीचा जलसाठा लक्षात घेऊन जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले. वरच्या भागातील अपरिहार्य गरज भागून जायकवाडीत किती पाणी सोडता येते यावर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि ३१ आॅक्टोबरपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी, असेही प्राधिकरणाने सांगितले. त्यानुसार महामंडळाने वरच्या भागातील कोणत्या भागातील धरणातून जायकवाडीत किती पाणी सोडता येते याची आकडेमोडही केली; परंतु पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही, उलट वेळकाढू भूमिका घेतली. आता उच्च न्यायालयाने जायकवाडीच्या प्रकरणात फक्त पिण्यासाठीच वरच्या भागातील धरणातून पाणी सोडावे, असा आदेश दिला आहे. महामंडळाने प्राधिकरणाच्या आदेशांची वेळेवर अंमलबजावणी केली असती तर आतापर्यंत जायकवाडीत पाणी आले असते, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.