शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

गोदावरी महामंडळाच्या दिरंगाईने मराठवाड्याच्या तोंडचे पाणी पळाले

By admin | Updated: November 26, 2014 01:12 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी निकाल देत वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश दिला होता.

सुनील कच्छवे , औरंगाबादमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी निकाल देत वरच्या भागातील धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आदेश दिला होता. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी या आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही प्राधिकरणाने आदेशित केले होते; परंतु महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी वेळकाढू भूमिका घेत त्याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागविले. त्याचाच फटका मराठवाड्याला बसला आहे. जायकवाडीच्या वरच्या भागात मराठवाड्याच्या हक्काचे पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांमध्ये बेकायदा अडविले जात आहे. हे पाणी मिळावे यासाठी मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने आंदोलने होत आहेत. न्यायालयीन पातळीवरही मोठा लढा दिला गेला. त्याचाच भाग म्हणून पुढे हे प्रकरण महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेले. शेवटी प्राधिकरणाने १९ सप्टेंबर रोजी या प्रकरणात मराठवाड्याच्या बाजूने निकाल दिला. प्राधिकरणाने समन्यायी पाणीवाटपाच्या तत्त्वानुसार गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांमधील १५ आॅक्टोबर रोजीचा जलसाठा लक्षात घेऊन जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले. वरच्या भागातील अपरिहार्य गरज भागून जायकवाडीत किती पाणी सोडता येते यावर गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी तातडीने निर्णय घ्यावा आणि ३१ आॅक्टोबरपूर्वी त्याची अंमलबजावणी करावी, असेही प्राधिकरणाने सांगितले. त्यानुसार महामंडळाने वरच्या भागातील कोणत्या भागातील धरणातून जायकवाडीत किती पाणी सोडता येते याची आकडेमोडही केली; परंतु पाणी सोडण्याचा निर्णय घेतला नाही, उलट वेळकाढू भूमिका घेतली. आता उच्च न्यायालयाने जायकवाडीच्या प्रकरणात फक्त पिण्यासाठीच वरच्या भागातील धरणातून पाणी सोडावे, असा आदेश दिला आहे. महामंडळाने प्राधिकरणाच्या आदेशांची वेळेवर अंमलबजावणी केली असती तर आतापर्यंत जायकवाडीत पाणी आले असते, अशी प्रतिक्रिया सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.