शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

दुष्काळी आढावा बैठकांचा सुकाळ

By admin | Updated: July 15, 2014 00:59 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुष्काळाच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मात्र सुकाळ झाला आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादपावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुष्काळाच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मात्र सुकाळ झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत आणि मुख्य सचिवांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत टंचाईचा आढावा घेतला जात आहे. महिनाभरात औरंगाबादेत सात बैठका आणि पाच व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येत्या काही दिवसांत चाराटंचाईचे संकटही निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्वत्र पाणी आणि चाऱ्याचा दुष्काळ जाणवत असला, तरी प्रशासकीय पातळीवर आढावा बैठकांचा सुकाळ आहे. ३० जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेच ४ जुलै रोजी मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा विभागाची टंचाई आढावा बैठक घेतली. आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादेत टंचाईचा आढावा घेतला. केवळ वरिष्ठ मंत्र्यांकडूनच नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सातत्याने टंचाईवर खल सुरू आहे. मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी महिनाभरात पाच वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या. आढाव्याचा हा सिलसिला स्थानिक पातळीवरही सुरू आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार हेही आठवड्यातून एकदा महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत टंचाईचा आढावा घेत आहेत. तालुक्याची टंचाई आढावा बैठकमहिनाभरात त्यांनीही चार ते पाच वेळा बैठका घेतल्या. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर येथे नुकतीच तालुक्याची टंचाई आढावा बैठक घेतली. कोणतीही ठोस उपाययोजना नाहीयाबरोबरच स्थानिक आमदारांकडूनही टंचाईचा आढावा घेतला जात आहे. सातत्याने आढावा घेतला जात असला तरी टंचाई परिस्थितीत टँकरव्यतिरिक्त कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.विहिरी अधिग्रहित करण्यावरच भरटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू करणे आणि विहिरी अधिग्रहित करण्यावरच प्रशासनाचा भर आहे. याशिवाय जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत आतापर्यंत दोन वेळा टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.