शहरं
Join us  
Trending Stories
1
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
2
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
3
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
4
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
5
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
6
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
7
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
8
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
9
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
10
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
11
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
12
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
13
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
14
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
15
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
16
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
17
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?
18
बलुच आर्मीचा पाकिस्तानी आयएसआयवर तगडा वार; महत्वाचा एजंट मुहम्मद हसनीला उडविले...
19
बांगलादेशच्या नोटांवरून हटवला शेख हसीना यांच्या वडिलांचा फोटो, आता देशाच्या चलनावर दिसणार मंदिरे! 
20
गाडी चालवताना झोप लागली अन्...; 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, थोडक्यात वाचली अभिनेत्री

दुष्काळी आढावा बैठकांचा सुकाळ

By admin | Updated: July 15, 2014 00:59 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुष्काळाच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मात्र सुकाळ झाला आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादपावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी दुष्काळाच्या अनुषंगाने होणाऱ्या आढावा बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा मात्र सुकाळ झाला आहे. उपमुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत आणि मुख्य सचिवांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत टंचाईचा आढावा घेतला जात आहे. महिनाभरात औरंगाबादेत सात बैठका आणि पाच व्हिडिओ कॉन्फरन्स पार पडल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आता जुलै महिन्यातही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. येत्या काही दिवसांत चाराटंचाईचे संकटही निर्माण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. सर्वत्र पाणी आणि चाऱ्याचा दुष्काळ जाणवत असला, तरी प्रशासकीय पातळीवर आढावा बैठकांचा सुकाळ आहे. ३० जून रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टंचाई परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेच ४ जुलै रोजी मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाडा विभागाची टंचाई आढावा बैठक घेतली. आज पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगाबादेत टंचाईचा आढावा घेतला. केवळ वरिष्ठ मंत्र्यांकडूनच नव्हे तर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सातत्याने टंचाईवर खल सुरू आहे. मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी महिनाभरात पाच वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मराठवाड्यातील टंचाई परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या. आढाव्याचा हा सिलसिला स्थानिक पातळीवरही सुरू आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार हेही आठवड्यातून एकदा महसूल अधिकाऱ्यांच्या बैठकीत टंचाईचा आढावा घेत आहेत. तालुक्याची टंचाई आढावा बैठकमहिनाभरात त्यांनीही चार ते पाच वेळा बैठका घेतल्या. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी वैजापूर येथे नुकतीच तालुक्याची टंचाई आढावा बैठक घेतली. कोणतीही ठोस उपाययोजना नाहीयाबरोबरच स्थानिक आमदारांकडूनही टंचाईचा आढावा घेतला जात आहे. सातत्याने आढावा घेतला जात असला तरी टंचाई परिस्थितीत टँकरव्यतिरिक्त कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.विहिरी अधिग्रहित करण्यावरच भरटंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याचे टँकर सुरू करणे आणि विहिरी अधिग्रहित करण्यावरच प्रशासनाचा भर आहे. याशिवाय जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या बैठकीत आतापर्यंत दोन वेळा टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.