शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

दुष्काळाने जगणे मुश्किल!

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

बीड : कुठे सुन्या- सुन्या दावणी तर कुठे दावणीला पिळ देणारी गुरे़़़ तळाला गेलेल्या विहिरी- बोअऱ़़ धान्याचीही पंचाईत़़़़

बीड : कुठे सुन्या- सुन्या दावणी तर कुठे दावणीला पिळ देणारी गुरे़़़ तळाला गेलेल्या विहिरी- बोअऱ़़ धान्याचीही पंचाईत़़़़ वाढ खुंटलेल्या अन् कोमेजल्या पिकांचा उदास शिवाऱ़़ असे केविलवाणे चित्र जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात सगळीकडेच आहे़ दुष्काळी स्थितीमुळे जगणेच मुश्किल बनलेले शेतकरी आता उद्विग्न अवस्थेत मृत्यूला कवटाळू लागले आहेत़ समस्या एक नाही ़़़ झगडायचे तरी कुठवर अन् कसे? निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना यापेक्षा वेगळ्या नाहीत़ जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली़ सुगी वाया गेल्याने आता हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे तो केवळ जगण्याचा़ कधी एकदाच सालं सरेल अन् घामाचे मोती पिकतील़़़ याची शेतकऱ्यांना मोठी उत्कंठा लागली आहे़ दुष्काळाचे चक्रव्यूह भेदताना शेतकऱ्यांना एकना अनेक अडथळे पार पाडावे लागत आहेत़ मागच्या- पुढच्या पिकांचा ताळमेळच नसल्याने आर्थिक घडी पुरती विस्कटली आहे़ मीठ, मिरची अन् तेलाचीच चिंता दूर व्हायला तयार नाही़ ज्या शेतांमध्ये कष्टाने विक्री उत्पादन घेतले तेथे पेरलेले धान्यही परत मिळेल की नाही? अशी वाईट स्थिती आहे़ नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली;परंतु पावसाअभावी वाढ खुंटली अन् दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापासाचा झाडा होण्यास सुरुवात झाली़ तूर, सोयाबीनचेही असेच! बाजरीच्या कणसाला कुठे चार दाणे लागली तर कुठे काहीच नाही़ खरीप पिके घेऊन त्याच शेतात रबीची लागवड करु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ही संधी भेटलीच नाही़ रुसून बसलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले़ पावसाच्या भरवशावर चाढ्यावर मूठ ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे़ नितीन कांबळे ल्ल कडाटिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बागायतदारही ऊसतोड मजूर झाल्याचे विदारक चित्र आष्टी तालुक्यात दिसत आहे़कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये आष्टीचा आवर्जून उल्लेख केला जातो़ सलग पाच वर्षांपासून तालुका दुष्काळाला सामोरा जात आहे़ चारा, पाणी, धान्य आदी प्रश्न आ वासून उभे आहेत़ चारा नसल्यामुळे दुधाचा व्यवसाय बसला आहे़ अनेकांनी रोजगाराच्या शोधामध्ये कुटुंबियासह बाहेरगावी जाणे पसंत केले आहे़ त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली आहेत़ विहिरी, बोअर आटल्यामुळे पाण्यासाठीची भटकंती यंदाही कायम आहे़दरम्यान, दुष्काळी स्थितीचा व्यापारपेठेवर परिणाम दिसत असून उलाढाल कमी झाली आहे़ तालुका कायम दुष्काळी म्हणून जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना तात्पुरती मदत न करता ठोस उपाय करावेत, अशी मागणी जोर पकडू लागली आहे़