शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

दुष्काळाने जगणे मुश्किल!

By admin | Updated: November 21, 2014 00:48 IST

बीड : कुठे सुन्या- सुन्या दावणी तर कुठे दावणीला पिळ देणारी गुरे़़़ तळाला गेलेल्या विहिरी- बोअऱ़़ धान्याचीही पंचाईत़़़़

बीड : कुठे सुन्या- सुन्या दावणी तर कुठे दावणीला पिळ देणारी गुरे़़़ तळाला गेलेल्या विहिरी- बोअऱ़़ धान्याचीही पंचाईत़़़़ वाढ खुंटलेल्या अन् कोमेजल्या पिकांचा उदास शिवाऱ़़ असे केविलवाणे चित्र जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात सगळीकडेच आहे़ दुष्काळी स्थितीमुळे जगणेच मुश्किल बनलेले शेतकरी आता उद्विग्न अवस्थेत मृत्यूला कवटाळू लागले आहेत़ समस्या एक नाही ़़़ झगडायचे तरी कुठवर अन् कसे? निसर्गापुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना यापेक्षा वेगळ्या नाहीत़ जिल्ह्यात खरिपापाठोपाठ रबी हंगामातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली़ सुगी वाया गेल्याने आता हतबल झालेल्या शेतकऱ्यांपुढे प्रश्न आहे तो केवळ जगण्याचा़ कधी एकदाच सालं सरेल अन् घामाचे मोती पिकतील़़़ याची शेतकऱ्यांना मोठी उत्कंठा लागली आहे़ दुष्काळाचे चक्रव्यूह भेदताना शेतकऱ्यांना एकना अनेक अडथळे पार पाडावे लागत आहेत़ मागच्या- पुढच्या पिकांचा ताळमेळच नसल्याने आर्थिक घडी पुरती विस्कटली आहे़ मीठ, मिरची अन् तेलाचीच चिंता दूर व्हायला तयार नाही़ ज्या शेतांमध्ये कष्टाने विक्री उत्पादन घेतले तेथे पेरलेले धान्यही परत मिळेल की नाही? अशी वाईट स्थिती आहे़ नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली;परंतु पावसाअभावी वाढ खुंटली अन् दोन ते तीन वेचण्यांमध्येच कापासाचा झाडा होण्यास सुरुवात झाली़ तूर, सोयाबीनचेही असेच! बाजरीच्या कणसाला कुठे चार दाणे लागली तर कुठे काहीच नाही़ खरीप पिके घेऊन त्याच शेतात रबीची लागवड करु पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा ही संधी भेटलीच नाही़ रुसून बसलेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले़ पावसाच्या भरवशावर चाढ्यावर मूठ ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली आहे़ नितीन कांबळे ल्ल कडाटिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून बागायतदारही ऊसतोड मजूर झाल्याचे विदारक चित्र आष्टी तालुक्यात दिसत आहे़कायम दुष्काळी तालुक्यांमध्ये आष्टीचा आवर्जून उल्लेख केला जातो़ सलग पाच वर्षांपासून तालुका दुष्काळाला सामोरा जात आहे़ चारा, पाणी, धान्य आदी प्रश्न आ वासून उभे आहेत़ चारा नसल्यामुळे दुधाचा व्यवसाय बसला आहे़ अनेकांनी रोजगाराच्या शोधामध्ये कुटुंबियासह बाहेरगावी जाणे पसंत केले आहे़ त्यामुळे गावेच्या गावे ओस पडली आहेत़ विहिरी, बोअर आटल्यामुळे पाण्यासाठीची भटकंती यंदाही कायम आहे़दरम्यान, दुष्काळी स्थितीचा व्यापारपेठेवर परिणाम दिसत असून उलाढाल कमी झाली आहे़ तालुका कायम दुष्काळी म्हणून जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांना तात्पुरती मदत न करता ठोस उपाय करावेत, अशी मागणी जोर पकडू लागली आहे़