शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

दानशूरांनी हातभार लावल्याने महिला पुन्हा चालू लागली

By admin | Updated: December 22, 2014 00:11 IST

औरंगाबाद : आजारामुळे दोन्ही पाय निकामी झाल्याने गुडघ्यापासून तिची हालचाल थांबली होती.

औरंगाबाद : आजारामुळे दोन्ही पाय निकामी झाल्याने गुडघ्यापासून तिची हालचाल थांबली होती. पतीच्या मृत्यूनंतर घरकाम करून दोन्ही मुलींचा सांभाळ करणाऱ्या ४७ वर्षीय विधवेच्या दोन्ही पायांचे गुडघे बदलण्याची महागडी शस्त्रक्रिया करण्यासाठी शहरातील दानशूर धावून आले. त्यांनी तिच्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य खरेदी करून दिले. घाटीतील डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केल्याने आज ती आपली दिनचर्या स्वत: करू लागली आहे.दोन्ही पायांच्या गुडघ्याच्या वाट्या (टोटल नी रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी रुग्णालयात कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत या शस्त्रक्रियेचा समावेश नाही. त्यामुळे गरीब असो अथवा श्रीमंत रुग्ण त्यांना हा खर्च लागणारच असतो. त्यामुळे अनेक गरीब रुग्ण असे असतात की, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्याकडे पैसेच नसल्याने ते गुडघेदुखीचा त्रास सहन करीत असतात. अशाच प्रकारचा त्रास शारदा राजेंद्र माने ही विधवा अनेक दिवसांपासून सहन करीत होती. तिला नीट चालताही येत नसल्याने तिची दिनचर्याही मंदावली होती. एक महिन्यापूर्वी ती घाटीत दाखल झाली. तेव्हा आॅर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. एम.बी. लिंगायत यांनी तिला तपासले. तेव्हा त्यांनी तिला दोन्ही गुडघ्यांच्या वाट्या बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी लागणारा खर्चही त्यांनी सांगितला. तेव्हा त्यांनी शस्त्रक्रियेसाठी तुम्हाला कोणताही खर्च येणार नाही. मात्र, त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करण्याची विनंती केली. तिने स्वत:च्या अंगावरील दागिने विक्री केले. त्यानंतरही रक्कम कमी पडत असल्याचे ती राहत असलेल्या कॉलनीतील लोकांच्या लक्षात आले. त्यांनीही सढळ हाताने मदत केल्याने १५ नोव्हेंबर रोजी तिच्या एका गुडघ्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. तिच्या दुसऱ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केल्याशिवाय तिचा हा त्रास कमी होणार नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी ही बाब शहरातील दानशूर व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना मदत करण्याचे आवाहन केले.