शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

‘ठिबक’चे अनुदानही पाझरले

By admin | Updated: September 4, 2014 00:19 IST

भास्कर लांडे, हिंगोली तब्बल ३००० हजार शेतकऱ्यांना अनुदानासाठी तीन-तीन वर्ष वाट पहावी लागत आहे.

भास्कर लांडे, हिंगोलीमागील दोन वर्षांपूर्वीचेच अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नसताना नव्याने तुषार आणि ठिबक संच वाटपाचे नियोजन केले. तब्बल ३००० हजार शेतकऱ्यांना अनुदानासाठी तीन-तीन वर्ष वाट पहावी लागत आहे. हा विषय बाजूला पडला असून नव्याने ५००० लाभार्थ्यांची निवड केली जाणार असल्यामुळे ठिबकप्रमाणे अनुदान पाझरण्यासारखे आहे. निव्वळ उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम कृषी विभाग करीत असून वंचितांच्या पाठपुराव्यासाठी एकाही अधिकाऱ्याला वेळ नाही. २०१२-१३ वर्षीच्या सूक्ष्मसिंचन योजनेचे गुऱ्हाळ अद्यापही संपलेले नाही. अल्पभूधारकांना एकरी २१ हजार २५८ तर बहुभूधारकांना १९ हजारांच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे धाव घेतली. योजनेच्या नियमानुसार प्रारंभी एकूण रक्कम कंपनीकडे भरली. ताबडतोब आॅनलाईन प्रस्तावही दाखल केले. पूर्वसंमतीसाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे फाईलही दाखल केली. त्यानंतर कृषी विभागाने लाभार्थ्यांची पडताळणी केली. चाचपणी करून सबसिडीही जाहीर झाली. आज त्याला दोन वर्षांचा कालावधी उलटला. अजूनही अर्ध्या लाभार्थ्यांना अनुदानाची वाट पहावी लागते. विदर्भात २०१२-१३ चे अनुदान प्राप्त झाले तर २०१३-१४ चे आॅनलाईन प्रस्ताव सुरू झाले. मराठवाड्यातील बहूतांश जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुस्त अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा फटका बसत आहे. तब्बल वर्षभराच्या उशिराने अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेपासून दूर राहणे पसंत केले. आजघडीला ‘वापरा आणि फेका’ या तत्वानुसार ठिबक संच विकत घेतले जातात. एकरी २० हजारांचे अनुदान मिळत असले तरी तीन-तीन वर्षे वाट पाहण्याची वेळ नको, म्हणून शेतकरी या योजनेपासून लांबच राहणे पसंत करतात. त्यातही दिवसरात्र शेतात काम करणाऱ्या उत्पादकांना आॅनालाईन फॉर्म भरणे म्हणजे एखादे दिव्य पार केल्यासारखे वाटते. बहुतांश उत्पादकांकडे बँकेचे खातेही नसते. ठिबकाची योजना असल्याचे अनेकांना माहितीही नाही. अधिकाऱ्यांनाही कसल्याही प्रकारचे देणे, घेणे नाही. परिणामी वर्षभरापासून लाभार्थी कृषी विभागात चकरा मारीत आहेत. कृषी विभागाला एकही योजना धड राबविता येत नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कोट्यावधीचा खर्च करीत असताना लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नाही. योगायोगाने पोहोचली तरी तिचा लाभ मिळेपर्यंत मध्येच पाणी मुरते.