शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अक्षय तृतीयेसाठी करा, कळसा बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST

औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात करा व कळसा हे मातीचे छोटे माठ विक्रीला ...

औरंगाबाद : साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात करा व कळसा हे मातीचे छोटे माठ विक्रीला आले आहेत. मात्र, करा खरेदी करायचा की कळसा, यात अनेकांचा गोंधळ उडतो.

अक्षय तृतीया शुक्रवारी (दि. १४) आहे. आपल्या पितरांना वर्षभर पाणी पिण्यास मिळावे आणि त्यांनी तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद द्यावा, ही संकल्पना धर्मशास्त्राने केली आहे.

पुनर्जन्म मानत असल्याने ज्या ज्या व्यक्तीचे निधन झाले, ते कोणत्या ना कोणत्या रूपात जन्माला येत असतात. कोणी पशु-पक्षी म्हणून जन्माला येत असतो. त्यांना उन्हाळ्यात पाणी मिळावे, त्यांचे हाल होऊ नयेत, या हेतूने करा, कळसा दान देण्याची प्रथा पडली आहे. त्यासोबत गहू, आंबे सुद्धा दान देतात. अनेक जण घराच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी करा किंवा कळसामध्ये पाणी भरून ठेवतात, पक्ष्यांना खाण्यासाठी गहू, आंबे ठेवत असतात.

मात्र, आजही लोकांमध्ये संभ्रम आहे की, कोणी करा खरेदी करावा व कोणी कळसा खरेदी करावा. सुरेश केदारे गुरुजी यांनी सांगितले की, ज्यांची आई हयात आहे, पण वडिलांचे निधन झाले, त्यांनी कळसा ( मोठ्या आकारातील माठ) खरेदी करावा व ज्यांचे वडील हयात आहेत, पण आईचे निधन झाले, त्यांनी करा ( छोट्या आकारातील माठ) खरेदी करावा. तसेच ज्यांच्या आईचे व वडिलांचे निधन झाले आहे, त्यांनी करा व कळसा दोन्ही खरेदी करावे.

चौकट

अक्षय तृतीयेच्या दिवशी कधी करावी पूजा

करा व कळसाची पूजा सूर्योदयापासून ते दुपारी २ वाजेदरम्यान करावी. त्यासोबत गहू, आंबे दान द्यावेत किंवा गच्चीवर पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवावे.