शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

समाधानकारक पावसामुळे जिल्हा टँकरमुक्त

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

औरंगाबाद : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे.

औरंगाबाद : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला आहे. गावोगावी नेहमीच्या जलस्रोतांना पाणी आले आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे टँकर बंद केले आहेत. परिणामी आठ महिन्यांपासून टँकरवर तहान भागविणारा जिल्हा मंगळवारी टँकरमुक्त झाला. औरंगाबाद जिल्ह्यात यंदा जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे प्रशासनाने ठिकठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला होता. मे महिन्याच्या अखेरीस टँकरची संख्या १८२ झाली होती. जून महिन्यात पावसामुळे टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती; परंतु संपूर्ण जून महिना कोरडा गेला, त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढली. जूनअखेरीस टँकरची संख्या ३०७ वर पोहोचली. जुलैमध्ये ही संख्या आणखी वाढून ३२७ झाली; मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सतत चार दिवस पाऊस बरसत राहिल्यामुळे उन्हाळ्यात आटलेले अनेक स्रोत जिवंत झाले. ठिकठिकाणच्या विहिरी आणि कूपनलिकांना पाणी आले. त्यामुळे बहुसंख्य गावांचा पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी सुटला. परिणामी प्रशासनाने अनेक ठिकाणचे टँकर बंद केले.जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी २९७ टँकर सुरू होते. चार दिवसांपूर्वी यातील २७१ टँकर बंद करण्यात आले. पैठण, फुलंब्री, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड हे तालुके टँकरमुक्त झाले. केवळ औरंगाबाद आणि सिल्लोड या दोन तालुक्यांतच २६ टँकरने काही गावांना पाणीपुरवठा केला जात होता; पण आज मंगळवारी हे टँकरही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.