शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

जिल्हा क्रीडा समिती ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत

By admin | Updated: November 23, 2014 00:22 IST

जालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलात दर्जेदार खेळाडू तयार होण्याऐवजी दर्जाहीन सुविधांमुळे उदयोन्मुख खेळाडूंचे स्वप्न भंग पावत आहे. क्रीडा समितीनेही धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे.

जालना : येथील जिल्हा क्रीडा संकुलात दर्जेदार खेळाडू तयार होण्याऐवजी दर्जाहीन सुविधांमुळे उदयोन्मुख खेळाडूंचे स्वप्न भंग पावत आहे. क्रीडा समितीनेही धृतराष्ट्राची भूमिका घेतली आहे. दरम्यान, क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी जिल्हा क्रीडा समिती महत्वाची भूमिका पार पडते. असे असले तरी ही समितीही कागदी घोडे नाचविण्याचे काम करीत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. क्रीडा संकुलाची माहिती घेतली असता संकुलाचे अधिकृत उद्घाटनच झाले नसल्याचे कळले. साधारणपणे पंधरा- सोळा वर्षांपूर्वी हे संकुल वापरास सुरुवात झाली. अजतागायत हे संकुल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेतच आहे. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार खेळाडू अथवा स्पर्धा होत नसल्याचा आरोपही अनेकांनी केला. जिल्हा क्रीडा संकुलात खुले सभागृह, ४०० मीटर धावना पथ, पाच हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी, जलतरण तलाव, बंदिस्त प्रेक्षागृह, हॉलिबॉल, कबड्डी, खो- खो, बास्केट बॉल, टेनिस आदी खेळांची क्रीडांगणांची असतात. मुला- मुलींसाठी वसतिगृह, मल्टीजिम, वेटलिफ्टिंग, फिजिकल एक्झरसाईझ हॉल, पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आदी बाबी समावेश असाव्यात. त्याचबरोबर क्रीडा साहित्य खरेदीचाही समावेश आहे. असे असले तरी येथील संकुलात वरील सुविधा असल्या तरी त्या कशा आहेत परिस्थितीवरुन लक्षात येते. राजकीय सभांमुळे येथील मैदानात खड्डे खोदण्यात आले होते. तेही थातूरमातूर बुजविण्यात आले. त्यामुळे मुख्य मैदानाचीही माती होत आहे. लाखोंचे व्यायाम साहित्य चोरीस खेळाडूंसाठी सुसज्ज व अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा आहे. या जिममधील काही साहित्य चोरीस तर काही गंजल्यामुळे निरोपयोगी ठरत आहे. व्यायाम होण्याऐवजी दुखापत होण्याची शक्यता अधिक आहे. बॉक्सिंग मॅटचे अतोनात नुकसान होत आहे. इनडोअर हॉलही दुरुस्ती आला आहे. जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडा समिती असते. जिल्हाधिकारी हे अध्यक्ष तर क्रीडाधिकरी हे सचिव असतात. त्याचबरोबर दोन अशासकीय सदस्यांचाही समावेश असतो. असे असले तरी क्रीडा समितीची बैठक अथवा काही उपाय योजना झाल्याचे ऐकिवात नाही. ४क्रीडा समितीने याची दखल घ्यावी अशी मागणी आता पुढे येत आहे. विशेषत: उदयोन्मुख खेळाडू या प्रकाराने प्रचंड अस्वस्थ आहेत. क्रीडा संकुलाच्या माध्यमातून दर्जेदार सुविधा तर राहिल्या दूर क्षुल्लक बाबीसुध्दा उपलब्ध नाहीत.