शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

न्यायालयाच्या निर्णयाला जि.प.चा कोलदांडा

By admin | Updated: November 16, 2015 00:39 IST

लातूर : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील शिक्षकाला स्वजिल्ह्यात नियुक्ती देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने

लातूर : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील शिक्षकाला स्वजिल्ह्यात नियुक्ती देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयालाच लातूर जिल्हा परिषदेने चालढकलपणा चालवत कोलदांडा घातला आहे़ परिणामी, ‘त्या’ शिक्षकाने औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे़ या याचिकेचा निकालही खंडपीठाने दिला असून, यात जिल्हा परिषद प्रशासनाला फटकारले आहे़ चाकूर तालुक्यातील उजळंब येथील रहिवासी असलेले अनिलकुमार नरसिंग नाईकवाडे यांची नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत १५ जून २००४ रोजी सहशिक्षक म्हणून निवड झाली़ आदिवासी लक्षलग्रस्त किनवट तालुक्यात ते गेल्या १२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार पाच वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांच्यात इच्छेनुसार मागेल त्या जिल्ह्यात नियुक्ती देण्याचे आदेश आहेत. या निर्णयानुसार नाईकवाडे यांनी स्वजिल्ह्यात बदलीसाठी प्रस्ताव दाखल केला़ मात्र सातत्याने जागा रिक्त नसल्याची सबब पुढे करीत लातूर जिल्हा परिषदेने टाळाटाळ केली़ अनेकवेळा निवेदने देण्यात आली़ मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नाईकवाडे यांच्या प्रस्तावाला बगल देत त्यांच्या नियुक्तीकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही़ प्रशासनाच्या या टोलवाटोलवीच्या उद्योगाला कंटाळून शेवटी अनिल नाईकवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले़ या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने निकाल देताना जिल्हा परिषद प्रशासनाला फटकारले़ यात नाईकवाडे यांना लातूर जिल्हा परिषदेने रुजू करुन घ्यावे, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे़ आजपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कायदेशीर बाबी पुढे करीत त्यांच्या नियुक्तीसंदर्भात टाळाटाळ करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचा निर्णयाला न जुमानता जि़प़ने कोलदांडा घातला आहे़ (प्रतिनिधी)जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांवर असलेली स्थगिती शासनाने उठविल्यामुळे आता बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे़ लातूर जिल्ह्यात डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत १८ जागा अनुसूचित जातीसाठी रिक्त असल्याचे पुढे आले आहे़ मात्र जि़प़ प्रशासनाकडून पात्र शिक्षकांना रुजू करुन घेण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे़