शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

न्यायालयाच्या निर्णयाला जि.प.चा कोलदांडा

By admin | Updated: November 16, 2015 00:39 IST

लातूर : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील शिक्षकाला स्वजिल्ह्यात नियुक्ती देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने

लातूर : नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या लातूर जिल्ह्यातील शिक्षकाला स्वजिल्ह्यात नियुक्ती देण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयालाच लातूर जिल्हा परिषदेने चालढकलपणा चालवत कोलदांडा घातला आहे़ परिणामी, ‘त्या’ शिक्षकाने औरंगाबाद खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे़ या याचिकेचा निकालही खंडपीठाने दिला असून, यात जिल्हा परिषद प्रशासनाला फटकारले आहे़ चाकूर तालुक्यातील उजळंब येथील रहिवासी असलेले अनिलकुमार नरसिंग नाईकवाडे यांची नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत १५ जून २००४ रोजी सहशिक्षक म्हणून निवड झाली़ आदिवासी लक्षलग्रस्त किनवट तालुक्यात ते गेल्या १२ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ आदिवासी नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार पाच वर्षे सेवा झाल्यानंतर त्यांच्यात इच्छेनुसार मागेल त्या जिल्ह्यात नियुक्ती देण्याचे आदेश आहेत. या निर्णयानुसार नाईकवाडे यांनी स्वजिल्ह्यात बदलीसाठी प्रस्ताव दाखल केला़ मात्र सातत्याने जागा रिक्त नसल्याची सबब पुढे करीत लातूर जिल्हा परिषदेने टाळाटाळ केली़ अनेकवेळा निवेदने देण्यात आली़ मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नाईकवाडे यांच्या प्रस्तावाला बगल देत त्यांच्या नियुक्तीकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही़ प्रशासनाच्या या टोलवाटोलवीच्या उद्योगाला कंटाळून शेवटी अनिल नाईकवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दार ठोठावले़ या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने निकाल देताना जिल्हा परिषद प्रशासनाला फटकारले़ यात नाईकवाडे यांना लातूर जिल्हा परिषदेने रुजू करुन घ्यावे, असा आदेशही खंडपीठाने दिला आहे़ आजपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कायदेशीर बाबी पुढे करीत त्यांच्या नियुक्तीसंदर्भात टाळाटाळ करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे उच्च न्यायालयाचा निर्णयाला न जुमानता जि़प़ने कोलदांडा घातला आहे़ (प्रतिनिधी)जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांवर असलेली स्थगिती शासनाने उठविल्यामुळे आता बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे़ लातूर जिल्ह्यात डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत १८ जागा अनुसूचित जातीसाठी रिक्त असल्याचे पुढे आले आहे़ मात्र जि़प़ प्रशासनाकडून पात्र शिक्षकांना रुजू करुन घेण्याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे़