शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

‘ई-डिस्ट्रीक्ट’ मुळे चार हजार प्रमाणपत्रे वितरीत

By admin | Updated: February 11, 2015 00:26 IST

जालना : ग्रामीण भागात गावातच नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी केंद्र सरकारच्या ई-डिस्ट्रीक्ट या संगणक प्रणालीचा वापर करून

जालना : ग्रामीण भागात गावातच नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळावीत, यासाठी केंद्र सरकारच्या ई-डिस्ट्रीक्ट या संगणक प्रणालीचा वापर करून महा-ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात चार हजार प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे.पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्रातून नागरिकांना रहिवासी, उत्पन्न, राष्ट्रीयत्व इत्यादी प्रकारची प्रमाणपत्रे दिली जात होती.जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात येते. परंतु ही प्रमाणपत्रे आता गावातच मिळू लागल्याने नागरिकांची प्रमाणपत्रांसाठी होणारी धावपळ कमी झाली आहे. प्रमाणपत्रांसाठी शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी चकरा मारूनही नागरिकांना ती वेळेवर मिळतील, याची शाश्वती नव्हती. या महा-ई सेवा केंद्रात नागरिकांकडून अर्ज भरून मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती किंवा आवश्यक ते जोडपत्र घेतले जाते. त्यांना लागणारे प्रमाणपत्र किती दिवसात मिळणार, याची लेखी पावती दिली जाते. केंद्राद्वारे ‘ई-डिस्ट्रीक्ट’ प्रणालीचा वापर करून ही कागदपत्रे स्कॅन केली जातात. ई- मेल पद्धतीने ती संबंधित तहसील कार्यालयाकडे पाठविली जातात. प्रत्येक तहसिलदारांना युजर आयडी दिलेले असून तहसिलदारांच्या डिजीटल स्वाक्षरीचा उपयोग या प्रमाणपत्रांसाठी केला जातो. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जात प्रमाणपत्रे मात्र या पद्धतीने न देता ती कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या शहर व तालुक्याच्या ठिकाणी चकरा थांबल्या आहेत. (प्रतिनिधी)उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके यांना विचारणा केली असता ते म्हणाले, या प्रणालीमुळे नागरिकांचा व प्रशासनाच्या वेळेची बचत होत आहे. आगामी काळात ही सेवा अधिक गतिमान होईल, असा विश्वासही शेळके यांनी व्यक्त केला.