शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पदयात्रेच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा यांनी साधला मतदारांशी संवाद

By admin | Updated: October 2, 2014 01:22 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. बुधवारी बारी कॉलनी, अल्तमश कॉलनी, आझाद चौक भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी या भागातील प्रत्येक घरी जाऊन मतदानाचे आवाहन केले. राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेची सुरुवात हाजी फंक्शन हॉल येथून करण्यात आली. आजच्या पदयात्रेत आ. एम. एम. शेख व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजेंद्र दर्डा व एम. एम. शेख यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पदयात्रा ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने पुढे जात होती. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा पुढे वाहेद कॉलनी, टाकळकर सोसायटीमार्गे बारी कॉलनीत पोहोचली. त्यानंतर अल्तमश कॉलनीत राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील नागरिकांकडून सत्कार स्वीकारले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. पदयात्रा हशमत रहीम चौकात पोहोचल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी दुकानदारांशी भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन केले. परिसरातील विविध काँग्रेस संपर्क कार्यालयाच्या वतीने राजेंद्र दर्डा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. मौलाना आझाद चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी परिसरातील नगरसेवक , काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यानगर, न्यायनगरात आज पदयात्राराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज वॉर्ड क्र. ७० विद्यानगर, ७१ न्यायनगर भागात काढण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता अण्णांची टपरी विद्यानगर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.