शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:37 IST

डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे.

ठळक मुद्देमेयो, मेडिकलमध्ये रुग्णांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्या मोठी आहे.उपराजधानीत गेल्या पाच वर्षांत डासांच्या दंशाने मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचा फैलाव झपाट्याने झाला. या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शहरात २०१२ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४०वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१५ मध्ये २३० रुग्ण आढळून आले होते. २०१६ मध्ये १९५ रुग्णांना डेंग्यू तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर या वर्षी आतापर्यंत १३७ रुग्ण आढळून आले. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती सोबतच घराघरांची तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारी कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष रिकामी करून किंवा त्यात कीटकनाशक औषध फवारणी किंवा गप्पी मासे सोडून उपाययोजना करीत आहे. यामुळे काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. परंतु प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यूचा प्रकोप कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.तूर्तास शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी डेंग्यू रोगाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येत दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.डेंग्यूसदृश आजाराकडे दुर्लक्ष करू नकामेयो रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. दीपक मडावी यांनी सांगितले, सध्या रुग्णालयात तापाचे रुग्ण वाढले आहे. यात डेंग्यूची लक्षणे असलेली परंतु डेंग्यू नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप कमी होत नसेल तर पुन्हा डॉक्टरांना भेटावे, असेही ते म्हणाले.