शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

ग्रामीण भागात वाढली शेणखताची मागणी

By admin | Updated: May 27, 2014 01:22 IST

बनकिन्होळा : दरवर्षी रासायनिक खताच्या वाढणार्‍या किमती, शेतीची मशागत, बियाणे, औषधी, खुरपणी, वीज बिले, पीक काढणी खर्च वाढत असल्याने शेतजमीन कसणे कठीण झाले आहे.

 बनकिन्होळा : दरवर्षी रासायनिक खताच्या वाढणार्‍या किमती, शेतीची मशागत, बियाणे, औषधी, खुरपणी, वीज बिले, पीक काढणी खर्च वाढत असल्याने शेतजमीन कसणे कठीण झाले आहे. परिसरात शेती मशागतीबरोबरच शेणखत वापरण्यास शेतकरी पसंती दाखवीत आहेत. शेणखत शेतीसाठी सर्वोत्तम असून, शेतीचा पोत शेणखतामुळे सुधारला जाऊन शेणखत किमान दोन वर्षे जमिनीचा पोत टिकवून ठेवत असल्याने शेणखत वापरण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. पूर्वीच्या काळी संपूर्णत: शेणखत वापरले जाई; मात्र काळानुरूप शेती मशागत व उत्पन्नात बदल होत गेला. आजही रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एकीकडे जनावरांची संख्या कमी झाल्याने शेणखत दुर्मिळ होत चालले आहे. यापूर्वी शेणखत हे प्रतिबैलगाडीवर विक्री होत असे; मात्र बैलगाड्या कालबाह्य झाल्या. सध्या ट्रॅक्टरचा वापर शेतीसाठी वाढल्याने आजघडीस प्रति ट्रॉलीवर दर ठरविला जात आहे. आज जेवढा शेतीला खर्च लावला तेवढेच उत्पन्न वाढते, असे समीकरणच होऊन बसले आहे. या खर्चावर अंकुश कसा लावता येईल, याविषयी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे. माझ्याकडे गायी, बैल, बकर्‍या मोठ्या प्रमाणात असून, त्यामुळे शेणखत मोठ्या प्रमाणात असते. मी माझ्या शेतीमध्ये त्याचा पुरेपूर उपयोग घेतो. त्यामुळे माझी जमीन सुपीक असून, जमिनीचा पोतही चांगला आहे व उत्पन्नही चांगले निघते व अन्नधान्यही चवदार असते. असे अन्य एक शेतकरी परभत फरकाडे यांनी सांगितले. (वार्ताहर) मी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त करीत नाही. शेणखत शेतीसाठी सर्वोत्तम असून, जमीन ओलावा धरून राहते. मी नांगरणीअगोदर पाच ट्रॉली खत प्रति २५०० रुपये ट्रॉलीने विकत घेऊन मजूर लावून पांगविले व नंतर नांगरणी करून कपाशीसाठी सरी काढली आहे. असे प्रगतिशील शेतकरी मधुकर जाधव यांनी सांगितले.