शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
5
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
6
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
7
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
8
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
9
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
10
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
11
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
12
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
13
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
14
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
15
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
16
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
17
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
18
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
19
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार

वाहनांमध्ये मृत्यूचे सापळे...

By admin | Updated: December 16, 2014 01:04 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही धोकादायरित्या पत्रे, सळयांसह इतर वस्तूंची राजरोस वाहतूक सुरू आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातही धोकादायरित्या पत्रे, सळयांसह इतर वस्तूंची राजरोस वाहतूक सुरू आहे़ धोकादायक वाहतुकीमुळे सोनारी (ता़परंडा) येथील युवक दत्तात्रय गाढवे (वय-२६) याचा शनिवारी मृत्यू झाला आहे़ यापूर्वी अशा घटनांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत़ मात्र, तरीही धोकादायकरित्या वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकडे पोलिस प्रशासनासह उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केले आहे़उस्मानाबाद : सोमवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गासह इतरही वर्दळीच्या रस्त्यांवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी राजरोसपणे वाहनांमधून धोकादायक वाहतूक सुरू असल्याचे दिसून आले. वाहतूक शाखा व परिवहन विभागाकडून कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजरोसपणे सुरू असलेली ही वाहतूक पाहता कारवाईचा केवळ फार्स असल्याचे दिसते. शहरातील शिवाजी चौक, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिजाऊ चौक, नेहरू चौक, ख्वॉजानगरसह विविध ठिकाणच्या वर्दळीच्या ठिकाणाहून धोकादायकरित्या वस्तूंची वाहतूक करण्यात येते़ ट्रॅक्टर, मालवाहतूक टमटममधून सळया, पत्रे, लाकडी आडू आदीसह इतर साहित्याची वाहतूक मोठ्या जोमात सुरू आहे़ उस्मानाबाद शहरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शनिवारी सकाळी एका टमटममध्ये धोकादायरित्या शेतातील पाईप भरल्याचे दिसून आले़ तेथूनच पुढे जिजाऊ चौकाकडे एका मालवाहतूक टमटममधून चार ते पाच फूट बाहेर असलेल्या सळया नेण्यात येत होत्या़ ख्वॉजा नगर भागातील एका गॅरेजजवळ थांबलेल्या टमटमममध्येही धोकादायरित्या तारा बांधण्यात आल्या होत्या़ मात्र, या टमटमच्या चालकाने धोकादायक स्थिती असल्याचे ओळखू यावे, यासाठी लाल कापड लावले होते़ बायपास मार्गावरील एका गॅरेजवरही लाकडाने भरलेला टेम्पो थांबला होता़ आतील लाकडे बाहेर पडू नयेत, यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली नव्हती. तेथून पुढे सांजा मार्गावरील एका शाळेजवळ थांबलेल्या ट्रॅक्टच्या ट्रॉलीत दगडे भरलेली होती़ मात्र, पाठीमागील फाळका लावलेला नव्हता़ शहरातील काही मार्गावरील ही अशी अवस्था कायम दिसून येते़ ग्रामीण भागातही धोकादायरित्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची सतत रेलचेल असते़ (प्रतिनिधी)४वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग याबाबतीत कारवाई सुरू असल्याचे सांगत आहे़ या दोन्ही विभागांनी कारवाईचा बडगा काटेकोरपणे उगारला असता तर ही धोकादायक वस्तूंची वाहतूक सुरू राहिली असती का ? हाच खरा प्रश्न आहे़ दोन्ही विभागांच्या म्हणण्यानुसार कारवाई सुरू आहे़ कारवाई सुरू असली तरी धोकादायकरित्या वस्तूंची वाहतुकही जोमातच सुरू असल्याचे दिसते. कारवाई सुरू आहे४शहरात धोकादायक रित्या सळया, पत्रे आदी वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टमटमवर कारवाई करण्यात येत आहे़ याबाबत संबंधित व्यवसायिकांनाही लेखी पत्र देण्यात येणार असून, ही कारवाई सातत्याने होत राहणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोनि शेख यांनी सांगितले़साहित्य बाहेर ठेवता येणार नाही४यापूर्वीच्या नियमांमध्ये वाहनाच्या लांबीपेक्षा एक मीटर साहित्य बाहेर ठेवण्याची मुभा होती़ मात्र, काही दिवसांपूर्वी आलेल्या परिपत्रकात आता एक फूटही साहित्य बाहेर ठेवता येणार नाही़ त्याबाबत सर्वांना माहिती देण्यात आली आहे़ काही दिवसांपूर्वी वीज कंपनीचे पोल बाहेर ठेवून नेणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे़ परिवहन विभाग यापुढेही धोकादायकरित्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करेल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़