शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘डीसीसी’च्या एमडींना ठेवीदारांचा घेराओ !

By admin | Updated: May 2, 2017 23:38 IST

उस्मानाबाद : ‘पैसे नाहीत, नंतर या’ या उत्तराला कंटाळलेल्या अनेक ठेवीदारांनी मंगळवारी दुपारी डीसीसीच्या कार्यकारी संचालकांना घेराओ घातला़

उस्मानाबाद : कुणाच्या मुला-मुलीचे लग्ऩ़़ कुणाच्या आई-वडिलांचा दवाखाना तर कुणाच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च अशा एक ना अनेक कामासाठी पैसे मिळवेत म्हणून ठेवीदार डीसीसीच्या मुख्य शाखेत दररोज चकरा मारत आहेत़ ‘पैसे नाहीत, नंतर या’ या उत्तराला कंटाळलेल्या अनेक ठेवीदारांनी मंगळवारी दुपारी डीसीसीच्या कार्यकारी संचालकांना घेराओ घातला़ पैसे द्या, अन्यथा बँकेला कुलूप ठोकू, अशी भूमिका उपस्थित काही महिलांनी घेतली होती़रोखे घोटाळे, विना तारण कर्जवाटप, कर्ज वसुलीची न्यायप्रविष्ठ प्रकरणे अशा अनेक कारणांनी जिल्हा बँकेची आर्थिक घडी कोलमडली आहे़ दुसरीकडे शेतकऱ्यांची कर्ज वसुली आणि पीकविम्यातील रक्कम कर्जात कपात करू नयेत, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत़ दुसरीकडे कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी आंदोलने करण्यात आली आहेत़ असे असले तरी जिल्ह्यातील जवळपास ६ लाख ठेवीदारांचे आजही जिल्हा बँकेकडे ४४० कोटी रूपयांच्या ठेवी आहेत़ यात शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचा समावेश असून, अनेकांनी भविष्यातील प्रश्नांना सोडविण्यासाठी पै-पै करून जिल्हा बँकेत ठेवी ठेवल्या आहेत़ कोणाच्या ५० हजार तर कोणाच्या १० लाखापर्यंत ठेवी आहेत़ यापेक्षा अधिक ठेवी असलेल्या बड्या ठेवीदारांची संख्याही मोठी आहे़गत रबी हंगामातील पीक विम्याची रक्कम सध्या जिल्हा बँकेत आली आहे़ ही रक्कम आल्यानंतर प्रारंभी शासनाने कर्ज खात्यात काही रक्कम कपात करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार डीसीसीने जवळपास पाच कोटी रूपयांची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेतली होती़ सर्वस्तरातून होणारा विरोध पाहता शासनाने पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करून घेऊन नये, अशा सूचना दिल्या़ त्यानंतर कपात केलेली रक्कम खातेदारांच्या खात्यावर वर्ग करावी, यासाठी आंदोलने करण्यात आली़ त्यानंतर बँकेने कपात केलेल्या रक्कमेबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविल्याचे सांगितले़जिल्ह्यातील अनेक ठेवीदार शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा बँकेत पैसे मिळविण्यासाठी चकरा मारत आहेत़ मंगळवारी सकाळीच महिलांसह वयोवृध्द ठेवीदारांनी चक्कम कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांच्या कक्षात प्रवेश करून घेराओ घातला़ मुला-मुलींचे लग्न, शैक्षणिक काम, दवाखान्याचा खर्च अशा एक ना अनेक प्रश्न सांगून येणारा प्रत्येक ठेवीदार पैशाची मागणी करीत होता़ अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या उत्तरांनी समाधान होत नसल्याने उपस्थित काही महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट बँकेलाच टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता़ भूम तालुक्यातील गोलेगाव येथील लंका डोके, जळकोट तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील सलीमा शेख, अकुबाई (पा़) येथील शांता कसबे, अंबेजवळगा येथील अब्दुल शेख यांच्यासह इतर ठेवीदारांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी झालेल्या चर्चेनंतर घोणसे-पाटील यांनी लवकरच पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठेवीदार तेथून निघून गेले़(प्रतिनिधी)