शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बैल पोळ्यावर दुष्काळाची झूल़़

By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST

अल्प पावसामुळे शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे़ त्यामुळे पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाजारपेठेत दिसणारी गर्दी यावर्षी पहायला मिळत नाही़

यशवंत परांडकर, नांदेडशेतकऱ्यांचा सर्वांत आवडता आणि मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणजे पोळा़ पोळ्याला शेतकरी बैलांना सजवून त्यांची पूजाअर्चा करतो़ मात्र, यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे़ त्यामुळे पोळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी बाजारपेठेत दिसणारी गर्दी यावर्षी पहायला मिळत नाही़ महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकरी पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात़ बैलांना सजविण्यासाठी रंगीबेरंगी झालर, गोंडे, घुंगुरमाळ, केसाळी, कवड्यांची माळ, वेगवेगळ्या प्रकारचे गळ्यातील अलंकार खरेदी केले जातात़ तसेच नवीन कासरे, वेसन बाजारातून खरेदी केली जाते अथवा सूत आणून घरीच तयार केली जाते़ पोळ्याच्या पंधरा दिवस अगोदरपासूनच शेतकरी पोळ्याच्या तयारीला लागत असतो़ यामुळे गावातील वातावरण उत्साहमय असते़ परंतू यावर्षी पावसाच्या खेळीमुळे दुबार - तीबार पेरणी करून कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांमध्ये कोणताच सण साजरा करण्याचे आवसान उरलेले नाही़ त्याचीच परिणिती सध्या गावातील वातावरणावरून दिसत आहे़ पोळा दोन दिवसांवर येवून ठेपला़ बैलांना सजविण्याचे साहित्य आणि शेतीला लागणारी अवजारे बाजारात आली आहेत़ मात्र, सदरील साहित्य खरेदी करणारा ग्राहक असलेला शेतकरी बाजारात पहायला मिळत नाही़ पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना धुवून त्याला सजविले जाते़ पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य बैलास दिला जातो़ शेती अवजारांची पूजा होते़ यानंतर गावातील मारोती मंदीरापर्यंत सजवलेल्या बैलांची एकत्रित वाजत-गाजत मिरवूणक काढली जाते़ मंदीरासमोर मंगलाअष्टक होतात़ यामुळे गावास यात्रेचे स्वरूप येत असते़ आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी उसणवारी करून हा सण साजरा करीलही.परंतु एका दिवसाच्या उसणवारीने बैलाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार नाही, हे वास्तव स्विकारून बहुतांश शेतकरी आपल्याकडे असलेले पशुधन विक्रीस काढत असल्याचे चित्र बैल बाजाराहुन लक्षात येते़