शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

पालम तालुक्यात ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका

By admin | Updated: August 17, 2014 00:10 IST

पालम तालुक्यातील ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला आहे.

पालम : आॅगस्ट महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी लावलेली नाही. मागील दोन महिन्यांपासून तग धरलेल्या पिकांनी आता मात्र पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. पालम तालुक्यातील ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला आहे. शहरासह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या अखेरीस अल्पशा पावसावर पेरणी सुरू केली होती. १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, उडीद यासह विविध पिकांची पेरणी उरकून घेतली. पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी बी -बियाणे व रासायनिक खतावर हजारो रुपयांचा खर्च करून खिसा रिकामा केला आहे. परंतु अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. उजाडलेला प्रत्येक दिवस कोरडाठाक जात असून कडक उन्हाने शेतकऱ्यांना घायाळ करून सोडले आहे. पालम तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५० हजार ३०७ हेक्टर एवढे आहे. यापैकी ४६ हजार ९४५ हेक्टर जमीन वहितीखाली असून या जमिनीवर खरिपाची पेरणी झालेली आहे. कडधान्य पिकाची ६ हजार ३५० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तर तृणधान्य पिकाची २ हजार ८५० हेक्टरवर पेरणी करण्यात आलेली आहे. २५ हजार हेक्टरवर गळीत धान्य तर १२ हजार २०० हेक्टवर नगदी पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केलेली आहे. परंतु अजूनही पाऊस न पडल्याने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना धोका निर्माण झाला असून पिके सुकण्यास सुुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग निसर्गाच्या संकटात सापडला आहे. (वार्ताहर)